Ticker

6/recent/ticker-posts

*लेणी संवर्धन का आणि कशासाठी** भाग १ ते १० .वि. वा. येलवे*

 *लेख पहिला*

*लेणी संवर्धन का आणि कशासाठी*

*बौद्ध लेणी संवर्धन समिती, आपले सर्वांचे समूहात सहभागी झाल्याबद्दल आभार मानते, मित्रांनो आज पासून आपण लेणी संवर्धनाच्या विषयावर आपण मार्गदर्शक लेख सुरु करणार आहोत. तुम्ही सर्वजन मार्गदर्शक लेख मालेत अभ्यास केला. लेणी संवर्धनाचे काम चांगल्या प्रकारे कराल अशी अशा व्यक्त करतो.*

*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

*दि ग्रेट अशोका आर्मी*


*लेख पहिला*

*लेणी संवर्धन का आणि कशासाठी*


बंधुंनो, तथागत महाकारुनी भगवान गौतम बुद्ध यांनी धम्म उपदेश सारनाथ येथे दिल्या नंतर बौद्ध धम्मामध्ये भिक्षु परंपरा सुरु झाली, बौद्ध भिक्षु वर्षभर फिरती वर असायचे, आणि पावसाळ्यात निवाऱ्यासाठी (वर्षावासासाठी) तात्पुरती वस्ती उभारत, प्राचीन बौद्ध धर्मात सांगितल्या प्रमाणे कि, वर्षावासाची जागा गावाच्या किंवा शहराच्या सीमेबाहेर परंतु जवळ असे. सम्राट अशोकाच्या काळात पूर्व व पश्चिम महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार, प्राचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. वर्षावासाची परंपरा भगवान बुद्धांच्या काळापासून अविरत आजपर्यंत चालू आहे. प्रामुख्याने तात्पुरते उभारलेले, वस्ती उन-वारा या मुळे कायम स्वरूपी टिकत नसे, त्यातूनच भिक्षूंच्या वर्षावासासाठी शैलगृह/लेणी निर्माण केली, तरी ती देखील गावाच्या सिमे जवळच्या डोंगरामध्ये!.

बंधुंनो साधारणता २,५०० वर्षा पूर्वी पासून चालत आलेल्या वर्षावास परंपरेने अनेक भिक्षु निवासा करता २,२०० वर्ष पूर्वी लेणी, स्तुपांची निर्मिती झाली. प्रामुख्याने महाराष्ट्रात भाजा लेणी, जुन्नर येथील तुळजा लेणी, कोंडीवते लेणी, ह्या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेण्या अभाय्सातून समजल्या गेल्या आहेत. त्यानंतर कोंढाने नाशिक, बेडसे कारले, कुडा, इत्यादी लेनींची निर्मिती झाली. बंधुंनो नंतरच्या काळात वेरूळ, घारापुरी, कोरली गेली.

तसे प्रथम बौद्ध लेणींना भेट देताना प्रामुख्याने बौद्ध लेणीतील चत्यगृह, विहार, भोजन मंडप, निर्वाण भूमी, न्हाणपेढी, (अंघोळीच्या पाण्याची टाकी) पाणपोढी, (पिण्याच्या पाण्याची टाकी), कोढी, बाकाचे कट्टे, कमानी, स्तूप, खांबे, इत्यादीचा अंतर्भाग होतो. मुख्यता भाजा, कान्हेरी, व जुन्नर येथील मोठ्या शैल वसाहती मध्ये हे स्थापत्य प्रकार दिसून येतात. बंधुंनो आपणास एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. लेणी बांधलेली नसते, तर एक संघ पक्षाने कोरलेली असते, बऱ्याच ठिकाणी अर्धवट कोरलेली लेणी सापडते, तसेच काही लेनिंमध्ये साध्या अष्टकोणी कोरलेले दिसतात, तर कुलनेने नंतरच्या कारले, कान्हेरी, नाशिक येथील चत्यगृहामध्ये व विहारांमध्ये खांबांचे अलंकरण वाढवलेले दिसते, २००० वर्षा पूर्वी चालणाऱ्या रोम व भारतामध्ये भेटलेले अवशेष आपल्याला मोठ्या प्रमाणात पडलेले दिसतात. कारले जुन्नर येथील लेनिमध्ये यवनांनी दाने दिले आहे. अशी शीला लेख कोरलेले आढळतात. तसेच कान्हेरी येथील चत्यगृहाच्या बाहेर उंट तर भांजे येथे विहारात सेंटॉसर्चे (अर्धा माणूस व अर्धा प्राणी) इत्यादी परदेशी संदर्भ आढळतात. तसेच चित्रकला, जातक कथा भगवान बुद्धांच्या जन्माच्या कथा, तसेच शिलालेख, राजघराणे, दान धर्म, शिलालेख, राजे, मंत्री, व्यापारी शेतकरी, यांनी दान दीलेले शिलालेख त्याकाळात राजकीय, आर्थिक, धार्मिक बाबीचा अभ्यास करता यतो. 

बंधुंनो जगभरात आपल्या महाराष्ट्रात संशोधन करण्याकरता कित्येक विद्वान, अभ्यासक, संशोधक, आपले दुसऱ्या देशातील धम्म बांधव त्यांचा इतिहास शोधण्याच्या आपल्या डोंगर, दऱ्यात राना-वनात, लेणी जेथे आहेत तेथे चालतात लेणी पाहतात, तिचा अभ्यास करतात, संशोधक रिपोर्ट बनवतात. आणि आपल्या पूर्वजांचे लेण्यांशी काय धागादोरा सापडतोय काय याचा शोध घेतात. निदान आपल्या देशाचा तरी काय धागादोरा या भारतातील लेनिशी सापडतोय काय. याचा शोध घेतात मोठे मोठे संशोधक घडून आपआपल्या देशातील इतिहास भारतातील लेण्यांच्या माध्यमातून डोळस पणे अभ्यासतात आणि पुन्हा आपल्या देशात जावून मोठी मोठी पुस्तके लिहितात. आणि आपले जीवन सार्थक झाले असे समजतात. बांधवानो आपल्यातील एखाद दुसरा लेणी पर्यंत जातो, लेणी एकदा बघितली कि पुन्हा काय बघायची, असे स्पष्ट बोलतो. लेणी कितीदा पहिली तरी २,२००, वर्षा पासून आतापर्यंतचा सर्व इतिहास कोणत्याही लेणीच्या आता पर्यंत पूर्णपणे उलघडा झालेला नाही. आपल्या गावा जवळ, आपल्या तालुक्य जवळ, आपल्या जिल्ह्यात, असलेल्या लेणीत आपला इतिहास लपलेला आहे. त्याचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे आपली पाऊले पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याकरिता प्राचीन लेण्यांकडे वळली पाहिजे. आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला आपल्या मित्रांना, आपल्या सग्या सोयाऱ्यांना, आपल्या वैभवशाली इतिहासातून साक्ष असलेली लेणी आपण दाखविली पाहिजे. इथल्या इतिहासाचा अभ्यास करून जन मानसां मध्ये परसाविला पाहिजे. तर बंधुंनो आज आपण गृढ संकल्प करूया आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील आपल्याला महाराष्ट्रातील लेन्यांवरती पुन्हा पुन्हा जावून लेण्यांचा अभ्यास करूया.


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

*दि ग्रेट अशोक आर्मी.*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*लेख दुसरा*

*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*

बंधुंनो सप्रेम जय भीम, मागच्या लेखामध्ये आपण *लेणी संवर्धन का आणि कशासाठी?* हे पाहिले, लेण्यांची निर्मिती कशी झाली, परदेशातून अभ्यासक, संशोधक, आपले धम्म बांधव लेणी बघण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशात येतात, ४जंगलातून,. रानावनातून, फिरताना तसेच त्यांच्या पूर्वजांचा त्यांच्या देशाच्या इतिहासच्या खाणाखुणा आपल्या वैभवशाली लेण्यांमध्ये कसे शोधतात हे आपण पहिले मागच्या लेखात पाहिले . त्याचा क्रमश पाठ लेख दुसरा, *लेणी संवर्धन समितीच्या* वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनच्या कामाला हातभार लावावा. ही विनंती.


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

*दि ग्रेट अशोका आर्मी*


*लेख दुसरा*

*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*


बंधुंनो, मला तुमच्या बद्दल आदर आहे, तुमच्या मनामध्ये लेणी संवर्धनाचा विचार आला. आपल्या वैभवशाली इतिहासात साक्ष देणारी लेणी, ही आपण ह्या ना त्या कारणाने सर्वांनी पाहिली आहे. बंधुंनो, मला सांगायची गरज नाही. परंतु विश्लेषण व्हावे म्हणून सांगावे लागते, अशोक सम्राट यांनी ८६ हजार लेण्यांची निर्मिती केली, आणि धम्म कार्याला गतिमान करण्याकरिता धम्मास समर्पित केले. २,५०० वर्षापूर्वीचा इतिहास पाशानामधून कोरला आणि ह्या भूमीला बुद्धाची भूमी म्हणून नाव लौकिक मिळवून दिले. आज देखील कुठेही उत्खनन केले तरी तथागत महाकारुनी गौतम बुद्ध यांच्या मुर्त्या आणि बौद्ध धम्माशी संबंधित इतिहासचा उलघडा होतो. 


बंधुंनो आपण सारे जाणकार आहोत. तथागत गौतम बुद्धांनी दीलेल्या शिकवणीचे पालन करणारे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्म दीक्षा घेवून पुन्हा बौद्ध धम्म जीवित केले; तो पर्यंत भारतातून बौद्ध धम्माचा शेवट झाला होता. बौद्ध धम्माच्या खाणाखुणा इथल्या करमट लोकांनी मिटवून टाकल्या होत्या. इथला खरा इतिहास लपवून खोट्या इतिहासाचा प्रचार प्रसार केला होता.


 महात्मा फुले म्हणतात, विद्ये विना मती गेली!! मती विना नीती गेली!! नीती विना गती गेली!! गती विना वित्त गेले!! वित्त विना शुद्र खचले!! इतके अनर्थ एका अविद्येने केले!! तर बंधुंनो, आपल्याला आपल्या महापुरुषांनी वेळोवेळी जागृत केलेले आहे. कशामुळे काय होते, हे वेगळे असे मी सांगायची गजर नाही. 

बंधुंनो लेणी बौद्ध धम्मातील २,२०० वर्षा पासूनचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या पूज्यनीय भंतेंनी तिथे धम्म उपदेश देऊन तथागत महाकारुनी गौतम बुद्धांच्या करुणेचा विचार जनमानसां मध्ये पसरविला. पराक्रमी दूरदृष्टी असलेले सम्राट, राजे, धनिक, शेतकरी, व्यापारी, वंदनीय अशा अनेक लोकांनी धम्माला आत्मसात करून तथागत महाकारुनी गौतम बुद्धांनी दाखविलेला मार्गाने चालून आपल्या जीवनात दान परिमिता करून लेणी कोरून घेतली आहे. आपल्या लेण्यांमध्ये अभ्यास करण्यासारख बरच काही आहे. उदाहरणार्थ नाशिक येथील तत्रिरेशमी लेणी (पांडव लेणी), समूह यांचे घेतले असता, सदर लेणी नाशिक पासून दक्षिणेला आठ ते नाऊ कि.मी. अंतरावर असलेल्या त्रिरेशमी डोंगरात स्थित आहे. त्यामुळे त्या लेणीला त्रिरेशमी या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेन्यांपैकी ही एक लेणी आहे. इसविसन पूर्व पहिल्या शतका पासून तिसरे शतका पर्यंत ह्या लेण्या कोरण्यात आल्या. लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात सदर लेणी ही इसविसन पहिल्या शतकात खोदली गेली, हे निश्चित करता येते, तसेच याच लेणी मध्ये असलेल्या शिलालेखा मध्ये प्रथम 'लेण' हा शब्द वापरण्यात आला. व त्यापासूनच आता पर्यंत शैल्यगृहासात" लेणी "हा शब्द वापरण्यात येऊ लागला. तर बंधुंनो अशा प्रकारे प्रत्येक लेणी मध्ये आपण अभ्यास करून शंशोधन करू शकतो, तसेच याच त्रिरेशमी लेणी मध्ये असलेल्या शिलालेखा वरून त्या काळातील आपल्या राजांची, सम्राटांची ओळख होते. सदर लेणी मध्ये क्षत्रप, सातवाहन आणि अभिर यांनी राज्य केल्याचे दिसून येते. या तीन ही राजघराण्यांनी बौद्ध धर्माच्या उपासनेला आणि श्रमण संघाला सहाय्य केल्याचे दिसते. असलेल्या लेणी समूहातील लेणी क्र. ३, ११, १२, १३, १४, १५, १९, व २० या लेण्यांमध्ये शिलालेखातून ऐतिहासिक माहिती पुष्कळ देशांची नावे पर्वत, नद्या, शहरे, गावे, खेडी अशा इतिहासातील बऱ्याच भागांचा खुलासा करता येतो. हे उदाहरणार्थ आपणस सांगत आहे.

बंधुंनो अभ्यास करण्यासारख लेणी मध्ये बरच काही आहे. फक्त आपली अभ्यास करण्याची तयारी हवी आहे. पुन्हा पुन्हा लेणी वरती जावून लेणी समजून घेऊन मिळालेली माहिती प्रामाणिकपणे जनमाणसां मध्ये पोहोचविण्याची जबादारी आपण स्वीकारली पाहिजे. तर *बंधुंनो आज आपण संकल्प करूया कि, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात असलेल्या लेणीवरती आपण पुन्हा पुन्हा जावून, लेणी पर्यंतचा रस्ता येणाऱ्या श्रमण, भिक्षु, धम्म बांधव, अभ्यासक, संशोधक, चिकित्सक, पर्यटक, यांच्या करता सोयीचा बनविण्यासाठी दिशा निर्देशक बोर्ड लावून, रस्त्यात पडलेली झाडे-झुडपे, तोडून रस्ता मोकळा करून रस्त्यात पडलेले दगड गोटे बाजूला करून आपल्या लेणी पर्यंत येणाऱ्या श्रमण, भिक्षु, धम्म बांधव, अभ्यासक, संशोधक, चिकित्सक ,पर्यटकाकरता सुख सोयीचा करून आमच्याकडे असलेली उपलब्ध माहिती श्रमण, भिक्षु, धम्म बांधव, अभ्यासक, संशोधक, चिकित्सक, पर्यटक, यांना देऊन त्यांचाशी माहितीची आदान प्रदान करून लेणीवर कोणीही कोणताही गैर प्रकार करणार नाही याकरता सदर लोक जागृत असून, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात बौद्ध लेणींची माहिती उपलब्ध असलेल्या माध्यमातून प्रसारित, प्रचारित करून.*

        

                             - क्रमश


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक*,

*दि ग्रेट अशोका आर्मी.*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


*लेख तिसरा*


*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*


मागील लेखात आपण लेणी संवर्धणा बद्दल लेणीचा अभ्यास कसा करता येईल या बद्दल थोडक्यात पहिले. आपल्या राज्यांची, सम्राटांची, नावे त्या काळातला इतिहास शिलालेखातला कसा उलघडा होऊ शकतो, हे पाहिले आणि आपण संकल्प केला. तर बंधुंनो त्याचा क्रमशपाठ लेख तिसरा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला हातभार लावावा ही विनंती.


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

*दि ग्रेट अशोका आर्मी*


*लेख तिसरा*


*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*


बंधुंनो, लेणी संवर्धनाबाबत विचार करताना नेहमी आपल्याला असे वाटत असेल, मी जास्तीत जास्त काय करू शकतो? जास्तीत जास्त लेणी वरती जाईल, लेणी बघेन, चार पाच फोटो काढेन, सेल्फी काढेन, माझ्या दोन चार मित्रांना लेणी दाखवायला घेऊन जाईन, चार लोकांच्यात बसून चार मित्रांच्यात बसून लेणी वर काढलेले फोटो दाखवून लेणी बद्दल थोडक्यात सांगणे. त्या पेक्षा जास्त मी काय करू शकतो? सहाजिकच आहे हा प्रश्न सर्वांच्याच मनात येतो. तर बंधुंनो एकदा का तुम्ही लेणीवर गेलात. एखादी लेणी अभ्यासका कडून लेणी वाचायला शिका कि, तुम्ही पुन्हा लेणीवर जावून पुन्हा पुन्हा लेणीवर जावून लेणी वाचाल. 


बंधुंनो लेणी कशी वाचायाची या बद्दल मला तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे कि, एकट्या महाराष्ट्रामध्ये साधारणता ८०० च्या आसपास लेण्या आहेत. ज्वालामुखी, अग्नी जण्य खडकांपासून निर्माण झालेल्या सह्याद्री पर्वत रांगेत बऱ्याच लेण्या कोरण्यात आल्या, प्रत्येक लेणी कोरण्यापुर्वी ती लेणी कोरण्यास योग्य आहे कि नाही याचा आपल्या पूर्वजांनी आधी अभ्यास केला होता. लेणी एकसंध पाषाणात कोरणे शक्य असेल तरच लेणी निर्मिती केली जात होती. प्रत्येक लेणी ही त्या विभागातील आपली पराक्रमी दूरदृष्टी असलेले सम्राट, राजे, धनिक, शेतकरी, व्यापारी, वंदनीय अशा अनेक लोकांनी धम्माला आत्मसात करून तथागत महाकारुनी गौतम बुद्धांनी दाखविलेला आपल्या जीवनात दान परिमिता करून लेणी कोरण्याकरिता लेणी कोरणाऱ्याला त्यांनी दीलेल्या दानातून लेणी करणाऱ्या कडून लेणी कोरून घेतली, क्वचित प्रसंगी युद्ध जण्य प्रसंग उतभवल्यामुळे लेणी कोरण्याचे काम अपूर्ण राहिलेले तसेच दगड नित्कृष्ठ दर्जाचा लागल्यामुळे लेणी कोरणे शक्य नसल्याने लेणी कोरण्याचे काम किंवा अर्धी लेणी कोरून लेणी पूर्ण करण्याचे काम केले नाही. तसेच देणगी देणारे यांनी दिलेली देणगी प्रमाणे लेणी कोरणाऱ्यानां लेण्या कोरल्या/घडविल्या आहे. कित्येक वेळा दान, देणगी देण्याचे जे ज्या प्रमाणे होते त्यापमाणे न घडल्या कारणाने देखील कित्येक लेण्या/लेण हे अर्ध्यावर कोरून पूर्णत्वाला नेले नाही. महाराष्ट्राच्या कित्येक ठिकाणी अशा प्रकारच्या अर्ध्यावर कोरून ठेवलेल्या लेण्या सापडत आहेत. काही लेण्यांमध्ये त्यानंतर शिवलिंग इत्यादी निर्मित करून त्या लेण्या पांडव लेण्या, शिव लेण्या, हिंदू लेण्या, म्हणून प्रचलीत करण्याचा प्रयत्न १७ व्या व १८ व्या शतका पासून केला.


बंधुंनो, अशा लेण्यांवर देखील जावून आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे. लेणी निर्मिती करण्याऱ्या धम्म बांधवांना आपल्या धम्माशी संबंधित असलेले एखादी संज्ञा, खानाखुणा, अशा लेण्यांमध्ये देखील कोरून निर्मिती करून ठेवलेली असल्याची शक्यता आहे. तसेच एखादा शिलालेख देखील लिहून ठेवलेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बंधुंनो अशा लेण्यांच्या आजूबाजूला पाणपोढी, न्हाणपोढी, सर्व प्रथम कोरले गेले असता बऱ्याच वर्ष तेथे साफसफाई न झाल्या कारणाने त्या बुजून गेलेले असल्याची पण शक्यता असते, अशा लेण्यांच्या आजूबाजूला दगडाचा (कातडाचा) अंदाज घेऊन जर निरीक्षण केले तर सहज डोळ्याला दिसेल अशा स्थितीमध्ये शेवाळ वाढलेले, किंवा पाणी आटलेले, दगड मातीने भरलेले किंवा अर्ध भरलेले, पोढी मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यावर शिलालेख ज्यांनी धम्म दान दिला आहे. त्याच्या नावाची शक्यता आहे. 


तर बंधुंनो प्रत्येकाला आपल्या गावातील अधिक माहिती असते आपल्या गावातील जेष्ट, श्रेष्ट लोकांकडे चर्चाकरून अशा प्रकारचे अर्धवट कोरलेल लेण/लेणी पाणवठे, आपल्या गावाजवळ, जंगलात कुठे आहे का, व्यवस्थीत निरीक्षण करून पाहून घ्या. तर बंधुंनो अशा अर्धवट कोरलेल्या लेण किंवा लेण्यांपासून समूह हा आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झोकात आलेला नाही. जर आपण आपल्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील जवळपास आढळणारा अशा प्रकारच्या लेण/लेण्यांचा पोढीचा अभ्यास करूया छोटे छोटे लेख यु ट्यूब विडीयोज बनवून ते प्राथमिक स्वरुपात प्रकाश झोकात आणण्याचा पर्यंत करू शकता. तसेच अशा लेण/लेणी पोढी याचा ग्रामपंचायत, तलाठी, जिल्हाधिकारी इत्यादी स्थानिक पातळीवर तसेच भारतीय पुरातन विभाग, यांना कळवून तेथे त्यांच्या तर्फे उत्खनन करून तिथल्या इतिहासाचा उलगडा करू शकता. ही भूमी बुद्धांची आहे. जिथे जिथे उत्खनन होईल तेथून फक्त आणि फक्त तथागत भगवान बुद्धच मिळून येतील.

बंधुंनो, हा लेख थोडा मोठा होत असला तरी बंधुंनो ह्या क्रमश मालिकेमध्ये सर्व प्रथम लेणीच्या दर्शनीय भागाचा अभ्यास कसा करायचा हे आपण पाहाणार आहोत. लेणीचे चैत्यगृह्याचा अभ्यास कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. लेणी दिसणारे कोरीव स्तूप, यांचा अभ्यास कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. लेणीत दिसणारे खांब आणि त्यावर कलाकृती यांचा अभ्यास आपण पाहणार आहोत. तसेच लेणीतील चित्रकारिता आणि लेणीतील शिलालेख यांचा देखील आपण अभ्यास कसा करायचा आपण पाहणार आहोत. आणि शेवटी महाराष्ट्रातील सर्व लेण्यांचा व्यतिरिक्त अभ्यास करणार आहोत. 


तूर्तास हा लेख क्रमश ठेवून येथेच थांबण्यापूर्वी आपण सर्वांनी एक संकल्प करूया महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक लेणीचा शोध घेवून आपण आपला गौरवशाली इतिहास संपूर्ण जगामध्ये पसरवण्यास वचन बद्ध आहोत. 


क्रमश


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

*दि ग्रेट अशोका आर्मी*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




*लेख चौथा*

*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*

बंधुंनो मागच्या तिसऱ्या लेखात आपण पाहिले लेणी कोरण्याकरिता दगड आपले पूर्वज अभ्यास करून निवडत होते. त्यातल्या त्यात लेणी कोरण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर बुद्ध जण्य परिस्थिती निर्माण झाली. कि, लेणी कोरण्याचे काम अर्धवट थांबविले जात होते, निष्कृष्ट प्रतीचा दगड, किंवा दान देणाऱ्यांनी दान देण्याचे ज्या प्रमाणे संकल्प पीले होते, त्या प्रमाणे दान न आल्या कारणाने लेणी कोरण्याचे काम अर्धवट राहिले. अशा लेणी महाराष्ट्राच्या लाखो लेण/लेण्या महाराष्ट्रात आहेत. तर बंधुंनो आता संकल्प केला, आपल्याला अशा लेण्यांचा शोध घेऊन तिथला गौरवशाली इतिहास समाजामध्ये पसरविणार आहोत तर बंधुंनो त्याचा प्रमुख क्रमशपाठ. लेख चौथा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला आपण हातभार लावावा ही विनंती. 


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक*,

*दि ग्रेट अशोका आर्मी*


*लेख चौथा*


*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*


बंधुंनो, आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या जगात वावरत आहोत. आज आपण कुठेही गेलो तरी आपल्या सोबत आपला स्मार्टफोन असतो नि असतोच संपूर्ण जग आपल्या हातातल्या मोबईलच्या स्क्रीन वर अंगठ्याने आपण स्क्रोल करू शकतो. हवी ती माहिती एका मिनिटात सर्च करू शकतो, डाऊनलोड करू शकतो, शोषल मिडीयावर शेर करू शकतो. तर बंधुंनो ह्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये लेणी संवर्धनाचे काम करणे हे अत्यंत सोपे झाले आहे. आज आपण लेणी संवर्धनाच्या लेख मालीकेमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्हयामधील एखाद्या लेणीवर आपण गेलो असता, त्या लेणीचा दर्शनीय भाग कोणत्या दिशेला तोंड करून आहे. GPRS च्या माध्यमातून जरी आता बऱ्याच लेण्यांचे लोकेशन सेट केले असले तरी, बरेच लोकेशन चुकीचे सेट केलेले आहेत. तसेच हजारो लेण्या अजून GPRS च्या माध्यमातून त्यांचे लोकेशन सेट केलेले नाही. आपण लेणीवर पोहोचल्यावरती ताबडतोब लोकेशन बरोबर आहे कि नाही हे चेक करावे. चुकीचे असल्यास सेट करावे किंवा लोकेशन सेट केलेले नसल्यास GPRS ने लोकेशन सेट करावे. 


बंधूनो आपल्या मोबईल मधील अॅप ने कप्मास द्वारा दर्शनीय भाग कोणत्या दिशेला आहे हे पाहावे. दर्शनीय भागावर असलेले बौद्ध धम्माची प्रतीके आहेत का पाहावे. 


बंधुंनो, लेणी कमान पहिले असता त्याच्या समोर एखादा किंवा दोन स्तंभ असतात.कधी चार हि स्तंभ अष्टकोणी किंवा गोलाकार असतात , सालंकृत स्तंभ खोदुन दगडी, चौथऱ्यांवर उभे असतात. स्तंभावर धम्मलीपी मध्ये किंवा खरोस्टीलिपी मध्ये शिलालेख लिहिलेले असतात. स्तंभांच्या खालच्या बाजूस यक्ष कोरलेले आढळतात. स्तंभ अलंकारी असून स्तंभांच्या वर प्रतीकात्मक हत्ती, घोडा, बैल शिल्पंकिक केलेले असतात. कधी कधी स्तंभ अर्धवट तुटलेला देखील असतो, लेणीच्या दर्शनीय भागाला पाहिल्यावर लेणी हिनयान पंथाची आहे कि, महायान पंथांची आहे हे समजून येते. बौद्ध हिनयान पंथांतील लेण्या जास्त पुरातन असून त्यामध्ये बुद्ध मूर्ती नसते. तसेच महायान पंथातील लेण्यात स्तूप व बुद्धाची मूर्ती दिसते. बुद्ध लेण्यात चैत्य व विहार हे दोन प्रकार दिसून येतात.


 चैत्य म्हणजे भिक्षूंचे प्रार्थना मंदिर व विहार म्हणजे त्यांचे निवास स्थान, चैत्यात मूर्ती, स्तूप असून विहारात भिक्षूंच्या निवासाची व्यवस्था असते.


 मोठ्या लेण्यांमध्ये चौक व भौतालिक खोल्या असतात. तर लहान विहारात खोदुन काढलेल्या खोल्या असतात.


 लेणीचे कमानीवर यक्ष, यक्षिणी तसेच जातक कथा कोरलेल्या दिसून येतात. काहिक ठिकाणी लेणींच्या चैत्यगृहाचा दरवाजा पानांप्रमाणे असून कलात्मक बौद्ध चरित्रातील अनेक प्रसंग शिल्पंकिक केलेले दिसते. काहिक लेण्यांमध्ये बुद्धाच्या वज्रपाणी, पथ्यपाणी यांच्या सुरेख मूर्ती दिसते. काहिक लेण्यांच्या कमानीवर शिलालेख कोरलेले आहे. भांजे, कोंडाणा, पितळ खोरे, अजंठा, कारले नाशिक लेणी हीनयान पंथांची असून अजंठा, वेरूळ, कान्हेरी औरंगाबाद, पन्हाळे-काजी ही महायान पंथातील लेणी आहे.


 लेणीच्या दर्शनीय भागात लेणी कोणत्या पंथांची आहे. हे समजून येते. बंधुंनो, प्रत्येक लेणीचा दर्शनीय भाग अत्यंत कला कुसरीने अप्रतिम असा अलंकृत केलेला असतो. तसेच काही ठिकाणी लेणी खांद्यावर उचलून धरलेली आहे. असा दर्शनीय देखावा तसेच लेणी हत्तीवर, उचलून धरलेली आहे. असा देखावा निर्माण केला आहे.


 बंधुंनो, इंटरनेटच्या माध्यमातून महाराष्टातील सर्व लेण्या दर्शनीय कित्येक आपल्या धम्म बांधवांना वेगवेगळ्या ऐंगंलने फोटो, विडीयो काढून फेसबुकवर, यु-ट्युबवर, अपलोड केलेले आहेत. तसेच प्राथमिक स्वरूपातील अभ्यास महाराष्ट्रातील, प्रसिद्ध लेण्यांच्या प्रथम दर्शनीय फोटो आणि विडीयो पाहून देखील करता येऊ शकतो. परंतु प्रत्येक्ष लेणी पाहण्याची आणि अभ्यास करण्याची मजाच वेगळी आहे. तर बंधुंनो, आज आपण सर्वांनी संकल्प करूया. *आपण आपल्या जीवनात कमीत कमी १० तरी लेण्यांवर प्रत्येक्ष पुन्हा पुन्हा जावून लेणी वाचन करू, लेणीचा अभ्यास करू. लेणीवर संशोधन करू. आणि आपण गौरवशाली इतिहास जानामानासंमध्ये पसरवू*. तूर्तास लेख खूप मोठ होत असल्या कारणाने पुढील लेख चैत्यगृह याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. बंधुंनो हा लेख क्रमश चालू ठेवून मी इथेच थांबतो.


*क्रमश*


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

**दि ग्रेट अशोका आर्मी**🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.



*लेख पाचवा*


*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*


बंधुंनो, मागील लेखात आपण टेक्नोलॉजी च्या जगात वावरत असताना आपल्याकडे असलेल्या स्मार्टफोन च्या माध्यमातून लेणी संवर्धन संबंधित अभ्यास कसा करू शकतो ही थोडक्यात माहिती. तसेच लेणीचा दर्शनीय भागाचा अभ्यास थोडक्यात केला. दर्शानीय भागावरून लेणी कोणत्या पंथातील आहे हे आपण ओळखू शकलो व शिकलो. बंधुंनो, आपण संकल्प केला कि कमीत कमी दहा लेण्यांवर सतत जावून आपण लेणी वाचन, लेणी अभ्यास, व लेणी शंशोधन करून आणि आपला गौरवशाली इतिहास जनमाणसांमध्ये पसरवूया तर बंधुंनो, त्याचा प्रमुख क्रमश पाठ लेख पाचवा. लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला आपण हातभार लावावा ही विनंती.


*वि. वा. येलवे* 

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

*दि ग्रेट अशोका आर्मी*


*लेख पाचवा*


*लेणी संवर्धन का आणि कशासाठी?*


बंधुंनो, सप्रेम जयभीम या लेख मालिकेतील पाचवा लेख आपल्या समोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे कि, या लेख मालिकेतील हे लेख वेगवेगळ्या सोशल मिडिया साईट वरून मोठ्या प्रमाणात फोरवर्ड केले जात आहे. तुम्ही देखील तुमच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फोरवर्ड करावे व तुमच्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. तर बंधुंनो आज या पाचव्या लेखात आपण पाहणार आहोत "चैत्यगृह". तर बंधुंनो लेणीमध्ये चैत्य हा एक शिल्प प्रकार आहे. अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना करण्याची सोय म्हणून लेणीमध्ये विहाराच्या जवळ पास भिक्षुंना प्रार्थने करता, प्रवचना करता उपयुक्त होतील अशा पद्धतीने चैत्यगृह खोदलेले आहेत. त्याला गंधकुटिका असेल ही म्हणतात. चैत्य हे ठराविक उंचीवर ठराविक दिशेवरच असतात. जेव्हा सूर्याची किरणे चैत्यामध्ये असलेल्या स्तुपावर पडलेली असतात तेव्हा संपूर्ण चैत्यगृह अत्यंत सुंदर दिसू लागते, खोदलेल्या चैत्यगृहामध्ये अंधुक प्रकाश असतो. परंतु स्तूपा समोर विपशनेसाठी बसल्यावर साधनेत बाधा येऊ नये यासाठी प्रकाश डोळ्यावर नवे तर पाठीमागे पडावा याची काळजी घेतलेली असते. 


सुरुवातीला चैत्यगृह चौकोनी आयताकार असून त्यांच्या प्रवेशद्वारासमोर मागील भिंतीत चैत्य वा स्तूप कोरलेला असे. पूर्वी भिंतींना अर्ध वर्तुळाकार आकार देण्यात आला. चैत्यगृहाच्या प्रशस्थ आकारा नुसार स्तंभांना दोन स्वातंत्र्य रांगा दोन्ही बाजूस भिंतींशी समांतर कोरण्यात येऊ लागल्या. आणि त्याच बरोबर चैत्यगृह व स्तूप मागील भिंती पासून पुढे आणून प्रदिक्षणाच्या पदाची रचना अस्तित्वात आली.


 लेणीत कोरलेल्या बुद्ध मूर्तीवर प्रकाश पडावा म्हणून या वास्तुत दर्शनीय भिंतीवर जाळी सहित मोठी खीडकी चैत्यगवाक्ष पडण्याची प्रथा हळू हळू अस्तित्वात आली, ही अर्ध वर्तुळाकार असल्या कारणाने ही घोड्याच्या नाळाच्या आकाराची कमान असेल.भगवान बुद्धांना बौद्धी वृक्षा खाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून चैत्यगवाक्ष चा आकार वास्तवात बौद्धीवृक्षा सारखा कोरण्यात आला. वरती गजपृष्ठकृती छप्पर कोरले जावू लागले.


 बंधुंनो, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात आपण घर बसल्या इंटरनेटच्या माध्यमातून कान्हेरी लेणीतील, अजिंठा लेणीतील, चैत्यगृह तसेच वेरुळची लेणी क्र. १० येथील चैत्यगृह, कार्ले येथील चैत्यगृह पाहू शकतो बेडसे' अजिंठा,कोंढाणा, शिवनेरी,जुन्नर येथील लेण्याचे मानमोडी लेनिन भूत लेणी इत्यादी येथील चैत्यगृह अभ्यासू शकतो . 


तसेच संपूर्ण भारतभरातील असलेल्या लेणीमधील चैत्यग्रृह पाहून त्यांचा अभ्यास होऊ शकतो. बंधुंनो, अभ्यासाकरिता कार्ले येथील चैत्यगृहाच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती सांगत आहोत. कार्ले येथील लेणी १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यात एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. तेथील चैत्यगृहातील स्तापत्य शिल्पे अत्यंत सुंदर आहेत. चैत्यगृहाच्या डाव्या हाताला एक सिंहस्तंब कोरलेला आहे. हा स्तंब ४५ फुट उंच असून त्याची बैठक वर्तुळाकार आणि अंग १६ कोनांमध्ये घडविलेले आहेत. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येते त्यावर आमलक हर्मिकेचा चोथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा करविता” महारठी, अग्निमित्रणक यांच्या दातृत्वाचा” शिलालेख दिसतो. बंधुंनो, चैत्यगृहाच्या उजव्या बाजूस उर्वी स्तंब चैत्य असावे असे अभ्यासकाला वाटते. त्याची सूचना शिलाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. येथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबामध्ये स्तूप दिसत आहे. बंधुंनो, या चैत्यगृहाचे कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते. कारण तेथे ही असे दोन स्तंभ दाखविलेले आहेत. चैत्यगृह बाहेर सज्जा कोरलेला आहे. तेथे मिथुन शिल्पांच्या जोड्या, हत्तींचे थर, भगवान बुद्धांचे त्यांच्या अनुयायिन सोबत असलेले शिल्पपट चैत्य कमानी आदी गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पात स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला असून कमरेला शेला आहे तर पुरुषांनी धोतर आणि डोक्यावर मुडसे घेतलेले आहे. स्त्रियांच्या हातात बांगड्या आहेत, तसेच विविध आकाराचे तोडे कमरेवर मेलाखा, गळ्यात मण्यांचे हार, कर्णफुले, कपाळावर कुंकू अशी आभूषणे दिसून येतेत.


 तसेच इतिहास कारांच्या मते ह्या मिथुन गोड्या तत्कालीन राज्यकर्त्यांच्या किंवा लेणी दान करणाऱ्या जोड्या असव्यात असाही एक तर्क आहे. अभ्यासांतर्गत असे दिसून आलेले आहे. यातील एक जोडी अन्गीमित्र आणि विरावती (इरावती) यांची आहे. तसेच सोबत एकतळ वीर या दासीचे शिल्प आहे. सज्जाच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रसादांचे देखावे आहेत. त्याच्या तळाशी दोन्ही बाजूस तीन हत्तींचे शिल्प कोरलेले आहे. त्यातील डाव्या बाजू कडील हत्तीवर पुढे गौतम बुद्धांच्या मुर्त्या कोरलेल्या आहे. चैत्यगृहांच्या सज्जात या लेण्यांच्या करवित्याचा लेख कोरलेला आहे. वैजयान्तिचा श्रेष्टी भूतपाल याने ही लेणी तयार केलेली असून, जम्बूद्विपातील असा लेख धम्मलिपीत कोरलेला आहे. 


तसेच बंधुंनो, त्रीरेशमी लेणीमध्ये लेणी क्र. १८ हे चैत्यगृह आहे. त्रीरेशमी लेणी समूह नाशिक येथील हे एकमेव चैत्यगृह आहे. या चैत्यगृहात सापडलेल्या शिलालेखात महाहकुसिरी (महाहकुश्री) च्या उल्लेखामुळे तसेच या चैत्यगृहाच्या आराखड्यावरून व समकालीन कार्ले, बेडसे इत्यादी ठिकाणच्या चैत्याचे वैशिष्ट्या वरून या लेण्याचा काळ संबंध क्रिस्त पूर्वी दुसऱ्या शकता पर्यंत जातो. बंधुंनो ज्या चैत्यगृहाचे प्रवेश द्वार अत्यंत आकर्षक व नाजून कलाकुसरीने अलंकृत आहे. प्रवेश द्वार चौकोनी आहे. व त्यांच्या भिंतींना लाकडी दरवाजे अडकविण्या करता छिद्रे पडलेली आहे. या प्रवेश द्वारावर पिंपळाकृती दोहेरी स्वरुपात कोरलेली आहे. त्यातल्या छोट्या कामानिमध्ये अत्यंत नाजून असे वेलबुटीचे नक्षीकाम बौद्ध धम्माचे प्रतिक असलेले रत्नत्रया चिन्ह व त्यांच्या दोन्ही बाजूला हत्ती, घोडे व वृषभ इत्यादी प्राणी नजाकतीने कोरलेले आहेत. या कमानीच्या आजूबाजूच्या दर्शनीय भागात तूल्या कोरलेल्या आहेत. तसेच या तुल्यांच्या टोकात मानवी चेहरे दाखविलेले आहे. वरच्या मोठ्या कमानी भोवती यक्ष बुद्धाचे उपासक अनेक छोट्या भिंतीत स्तुपांची रचना, भिंतीत स्तंब कोरलेले आहेत. आतले सभागृहाचे गज कृष्ट्कार असून त्यावर तुल्या सारख्या दगड्यांच्या पाट्या कोरलेल्या असून त्या शेजारी लहान चित्रे आहे. सभागृहाला १७ अष्टकोणी खांब आहे. या पैकी काही खांबांवरती शिलालेख कोरलेले आहेत. मध्यभागी साधारण पणे ५.५ फुट व्यासाचा व ६.३ फुट रुंदीचा दंडगोलाकृती स्तूप असून त्यावर हर्मिका आहे. त्यावरचे लाकडी छत्र काळाच्या ओघात नाहीसे झाले आहे. मात्र त्याचा खाचा अद्याप शिल्लक आहे. चैत्यगृहात एकूण ३ शिलालेख आहेत. त्यापैकी एक शिलालेखात चैत्य निर्माण करण्याबाबतचा महाहकुशिरीची नात राजकीय अधिकारी अगीयतनकाची पत्नी व कप्पकाननची काची माता, भट्टपालिका हिनेही चैत्यगृह तिरन्हू (त्रीरेश्मी) पर्वतावर निर्माण केलेले आहे. असा शिलालेख आहे तसेच प्रवेशद्वारा वरील या शिलालेखात प्रवेशद्वार वरील नक्षीकाम नाशिक परिसरातील जणते तर्फे वर्गणी देणगी घेऊन पूर्ण करून अर्पण केले आहे असा शिलालेख आहे. 


तर बंधुंनो, कान्हेरी येथील चैत्यगृह हे तसरे क्र. चे एकमेव चैत्यगृह आहे. ही लेणी कार्ले लेण्यांतील भव्य चैत्यगृहाची जणू प्रतीकृतीच बंधुंनो, कार्ले चैत्यगृह डोळ्यासमोर ठेवूनच त्याबर हुकुम केकेली ही रचना. फक्त येथे नेहमीचे पिंपळ पाणाकृती कमानदार सुगड वातायन मात्र कोरलेले नाही. अगदी साधी अशी रचना आहे. बंधुंनो, बाहेरच्या बाजूस द्वारपाल यक्ष पायऱ्या चढून जाताच आत प्रांगण तेथेच भव्य दोन सिंह स्तंभ भिंतींना एकवटून कोरलेले अशोक कालीन सिंह स्तंभा सारखी ही रचना कार्ले येथे सद्या एकच स्तंभ असला तरी तेथे पूर्वी दोन सिंह स्तंभ होते याला दुजोरी याच कान्हेरीच्या चैत्यागृहातून मिळतो दोन स्तंभपैकी एकावर सिंह यक्ष तर दुसऱ्यावर यक्ष कोरलेला आहे. सिंह स्तंभाच्या तळ खड्यात यक्ष प्रतिमा कोरलेले असून, ओसरीतील जवनिकेवर जोड्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दोन्ही स्तंभांच्या बाजूला शिलालेख कोरलेला आहे. ओसरीवरील डाव्या बाजूला समोरासमोर अशा दोन भव्य बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर शांतमित्रा मिटलेले डोळे आशीर्वाद देण्यासठी उपडा केलेला तळहात, अंगावरचे उत्तरीय डाविकडील एक विश्रांती कक्ष आहे. तेथेही दोन सुंदर अतिशय रेखीव अशा बुद्ध मुर्त्या कोरलेल्या आहेत. दोन्ही बाजूंना एक-एक ओळीत कोरलेले स्थंभ स्तंभांच्या शेवटाकडे असलेले मध्य भागी असलेले चैत्य त्या भोवती प्रदक्षिणा पद व वरती गजकृष्टाकार कोरलेले चाहत अशी रचना दिसून येते. आजूबाजूच्या स्तंभावरती हत्ती, वृषभ त्या आरूढ स्त्री पुरुषांच्या विविध प्रतिमा कोरलेल्या आहे. तसेच स्तुपांचे पूजन करणारे असलेले हत्ती व नाग मुकुट धारण करणारे स्त्री पुरुष विशेष उल्लेखनीय व आकर्षक आहेत. बहुतेक सर्व स्तंभावर अशाच प्रतिमा दिसून येतात. मुख्यचैत्यात हा गुळगुळीत आहेत. तळखडा, वेदिकापट्टी, अन्ड इतकाच भाग शिल्लक आहे. वरची हर्मिका आणि त्यावरील लाकडी चहात गायब झालेले आहे. चैत्यगृहाच्या शेजारच्या एका छोट्याश्या लेण्यात एक रेखीव स्तूप कोरण्यात आलेला आहे. त्या स्तुपाची हर्मिका व त्यावरील दगडाचे असलेले छत्र जे चैत्यलाच भिडवलेले आहे. स्तूपाच्या अन्डाबोवती चैत्य कमानीत बसवलेल्या बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. तर बधुंनो, सदर लेख खूप मोठा झालेला आहे हे मला माहिती आहे.( *या लेख मालिकेमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व लेणी आणि त्यातील चैत्यगृह स्तूप यांचा रिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत म्हणून थोडक्यात येथे आज माहिती दिलेली आहे*. ) चैत्यगृहाबद्दल लिहिण्याचा मोह मला अवगत नाही. तुम्हीदेखील बंधुंनो चैत्यगृहाचा अभ्यास केल्यानंतर त्या बद्दल सांगताना थांबणार नाही याची मला खात्री आहे. *तर बंधुंनो, नेहमी प्रमाणे आपण एक संकल्प करूया महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असलेल्या सर्व लेण्यांमध्ये चैत्यगृहांचा जास्तीत जास्त अभ्यास करू संशोधनात्मक निदान एक तरी लेख मी लिहीनच असा संकल्प करूया* तर बंधुंनो, मी ही लेख मालिका क्रमश ठेवून येथे थांबण्यपूर्वी पुढील भागात आपण लेणीमधील विहारे या बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.


*क्रमश*


*वि. वा. येलवे*

*राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

*दि ग्रेट अशोका आर्मी*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



**लेख सहावा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**


बंधुंनो, मागच्या लेखात आपण लेणी मधील **चैत्यगृहाबद्दल** थोडक्यात माहिती पाहिली, कार्ले, त्रीरेशमी लेणी आणि कान्हेरी लेणी येथील असलेल्या चैत्यगृहाबद्दल संबंधित आपण अभ्यास केला. इंटरनेटच्या माध्यमातून चैत्यागृहाचे आपल्या धम्म बांधवांचे वेगवेगळ्या अँगंलने फोटो, विडीयो काढून अपलोड केलेले आहेत. तरी देखील आपण प्रत्येक्ष लेणीवर न जाता घरबसल्या अभ्यास कसा करू शकतो हे पाहिले. परंतु लेणीवर जाऊन अभ्यास करण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तर बंधुंनो, आपण प्रत्येक्ष लेणीवर जाऊन चैत्यगृहाचे सजावट, शिल्पे यांचा थोडक्यात अभ्यास करून आपण सर्वांनी संकल्प केला. निदान एक तरी शोध निबंध लिहू. तर बंधुंनो, आपण आपला गौरवशाली इतिहास जनामासात पसरवू. याचा प्रमुख क्रमश पाठ लेख सहावा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. त्याचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला आपण हातभार लावावा ही विनंती.


**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**


**लेख सहावा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**


बंधुंनो, सप्रेम जयभीम, या मालिकेतील सहावा लेख सुरु करताना मला अत्यंत अभिमानाने सागावेशे वाटते कि, लेणी संवर्धनाचे काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू, बघिनींनी आपले लेख हे ते मेंबर असलेल्या लेणी संबंधित फेसबुक पेज वरून, ग्रुप वरून, तसेच व्हॉटसपच्या ग्रुप वरून, मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केले आहेत. मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी दिलेल्या सहकार्य बद्दल लेणी संवर्धन समिती, दि ग्रेट अशोका आर्मी, त्यांची सदैव ऋणी राहील. माझे धम्म बांधव असेच सतत सहयोग माला देतील अशी अशा बाळगतो आणि आजचा मुख्य विषय सुरु करतो. बंधुंनो आज आपण आपल्या गावोगावी, आपल्या समाजाच्या काहिक लोकांनी एकत्रित येवून दान परीमितीने, गावागावात अत्यंत सुंदर सुशोभित अशी बुद्ध विहारे बांधली आहे. बंधुंनो १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे श्रीलंकेचे बौद्ध भिक्षु महास्तीवर चंद्रमणी यांच्या कडून आपल्या अनुयायींसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेथेच पुन्हा भारतात बौद्ध धम्माची पुनरुज्जीवन झाले. बंधुंनो, त्यानंतर आपली आज्जी, आजोबा, आई, वडील, यांनी बौद्ध धम्माची स्वीकार करून बौद्ध धम्माच्या रीतिरिवाजा प्रमाणे जीवन व्यथित केले. आपल्या गावात विहार व्हावे यासाठी पोटाला चिमटा काढून यथाशक्ती छोटे का होईना परंतु गावात विहार बांधू असे संकल्प करून आपल्या गावांमध्ये विहाराची छोटी का होईना पण बांधणी केली, आज आपण आपल्या गावातली विहारांची बांधणी धर्मांतराच्या क्रांतिकारी निर्णयानंतर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दोन हजार पाचशे वर्षापूर्वीच्या या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे हक्कदार बनविलेआहे. आज मला सांगताना खुप खेद होतो, आपल्या गावातील विहारांमध्ये मोठी मोठी टाळी लागली आहे. गावातील किंवा चाळीतील, शहरातील काहिक लोकांची मक्तेदारी असल्यासारखे ती विहारे स्वताचा कब्जात ठेवण्याकरिता आपापसात संघर्ष चालू आहे. असो, बंधुंनो तो विषय येथे आज अभ्यासात नाही. परंतु आज आपण लेण्यांमधील विहारांबद्दल बोलणार आहोत.


बंधुंनो, पाली भाषेत विहार हा शब्द आराम या आर्थी वापरलेला आहे. भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायी (भिक्षुंना) धम्म प्रचारासाठी चारही दिशांनी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भिक्षु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत त्या ठिकाणांना विहार असे म्हणत. सुरुवातीच्या काळात अशा विहारांमध्ये एकच दालन (खोली) असे व तिच्या पुढे वरंडा असून, भिक्षूंची संख्या वाढल्यानंतर हळूहळू त्यांचा विस्तार होऊन त्यात आणखी दालनांची (खोल्यांची) भर पडली. आणि मोठे मोठे मंडप कोरण्यात येवू लागले. काहिक लेण्यांमध्ये मंडपांच्या दोन्ही बाजूच्या भिंती दालन (खोल्या) काढण्यात आल्या तसेच मंडपाच्या आकार मनानुसार आधारा करता काही अंतरावर समांतर असे स्तंभ कोरून त्या स्तंभांवर विविध वेलपत्तींनी, शिल्पांनी, स्तंभशिर्षांनी, चित्रांनी भूषविण्याची पद्धत पडली.


 बंधुंनो, आपण मोठ्या मोठ्या लेण्यांमध्ये गेल्यानंतर जे मोठे कोरीव मंडप आणि ताच्या आजूबाजूला असलेले खोल्या हे आपण पाहिलेले आहे.


 उदाहरणार्थी कार्ले नशिक, अजिंठा, व वेरूळ येथील मंडपांचे स्तंभ अलंकृत केलेले आहे. सुरुवातीच्या दिवसात कोरलेले विहारे आणि काढलेल्या आकृती बोधिवृक्ष, चक्र, पादुका इत्यादी प्रतीकात्मक चिन्हाने भगवान बुद्धांचे अस्तित्व सूचित केले आहे. महायान पंथाच्या उद्या नंतर विहारात मूर्ती शिल्पांना महत्व प्राप्त झाले आणि जातक कथातून बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग शिल्पाकिंक करण्यात आले. 


बंधुंनो, विहारांची साधारण रचना कान्हेरी लेणी मध्ये आपण पाहिली असता, लेणी क्र. ६७, कान्हेरी लेणी अत्यंत महत्वाची आहे. ओसरीच्या बाहेरच्या बाजूची कोरलेले खांब ओसरीच्या आतमध्ये सभा मंडप आणि त्याच्या आतमध्ये कोरलेले विश्राम कक्ष अशी ही कान्हेरी लेणीमध्ये रचना दिसून येते. हे विहार बुद्ध प्रतिमाने अक्षरशा भरून गेलेले आहे. जिकडे बघावे तिकडे प्रतिमा कोरलेल्या आहे. या विहाराचे निरीक्षण केले असता, तथागत बुद्ध सिहसनावर बसलेल्या चौरंगावर तर कधी पद्मासन घालून बसलेले, तर अवलौकिकतेश्वराच्या प्रतिमेत आशीर्वाद मुद्रेत, तर कधी कमळावर तर कधी पद्मपाणी बोधीसत्वाच्या रुपात ध्यानस्त. तसेच नंद आणि उपनंद ही दोन नाग शिष्ये कमळाच्या देठाना आधार देतना दिसतात.


कान्हेरी येथील ८९/९० क्रमांकाची विहार अत्यंत विशिष्टपूर्ण आहे. तेथील ओसरीत स्तंभावर कलाकुसार केलेली आहे. ओसरीतील कोपऱ्यात, तसेच विहारातील कोरीव बुद्ध प्रतिमा स्तूप प्रतीकांसह कोरलेले आहेत. विहारांमध्ये जाण्याकरिता कातळाचा जिना कोरलेला आहे. विहाराच्या बाजूला पाण्याचा साठा असलेली पाण्याची टाकी अंतर्गत कोरलेली आहे. विहाराच्या ओसरीच्या बाहेर हाताने पाणी काढता येईल अशी सोय केली आहे. लेणी क्रमांक ३४ हे कान्हेरी येथील विहार आहे. तेथे ओसरीत बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. तेथे अंतर्भागातील छतावर लक्षपूर्वक पाहिले असता. बोद्धीसत्वांचे एक अपूर्ण चित्र रंगविलेले दिसून येते. ध्यानस्त बसलेला बुद्धांचा चेहरा अपूर्ण अवस्थेत त्यांच्या आजूबाजूला नक्षीदार स्तंभ बाजूला सेवक वेलबुटीची नक्षी असे सोळाशे ते सतराशे वर्ष जुने चित्र अपूर्ण अवस्थेत सुव्यवस्थित आहे. बाजूला शिलालेख कोरलेला असून सातवाहन वंशीय माढरीपुत्र यांचा आहे. कान्हेरी लेणीमध्ये एक मोठे विहार कोरलेले असून त्या विहाराचा उपयोग बौद्ध भिक्षुंसाठी भोजनालय प्रमाणे करीत असल्याचे दिसून येते. त्या विहारात ताटे ठेवण्यासठी समांतर रांगेत उंच व त्याच्या दोन सपाट लाद्या कोरलेल्या आहे. आतल्या बाजूला बहुदा शीला ठेवण्याचे कक्ष कोरलेले आहेत. कान्हेरी लेणी १०९ लेण्यांच्या समूहातून त्यापैकी एक चैत्यगृह आहे. व १०८ हीनयान, महायान कालखंडातील विभन्न दात्यांनी दिलेल्या दानांनी कोरलेली विहारे आहेत. बंधुंनो, कान्हेरी लेणी क्र. १ हे दुमजली विहार आहे. 


बंधुंनो, आपणास प्रामुख्याने अभ्यास करण्याकरिता येथे त्रीरेशमी लेणी येथे आढळून आलेले विहारांबद्दल थोडक्यात माहिती देत आहे. त्रीरेशमी लेणी २४ लेण्यांच्या समूह असून त्या पैकी एक चैत्यगृह आहे, आणि बाकी सर्व विहारे आहेत. प्रामुख्याने त्रीरेशमी लेणीमध्ये आता आणखी तीन विहारांची भर पडली असून आपण सर्वजन सर्व वृत्त पत्रातून ही बातमी वाचत आहोत. बंधुंनो, लेणी क्र. ३ त्रीरेशमी लेणी ही अभ्यासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची आहे. लेणी क्र. ३ ला गौतमीपुत्र विहार असे संबोधले जाते. सातवाहन कुळातील महान सम्राट गौतमीपुत्र सात कर्नेची आई राणी गौतमी बळश्री हिने त्याच्या मृत्यूनंतर लेणी, विहार कोरले व धम्म संघाला स्मृतीप्रीत्यर्थ अर्पण केले. या लेणीला देवीची लेणी किंवा राणीची लेणी म्हणून ओळखले जाते. या लेण्यांत असलेल्या शिलालेखात सातवाहनाच्या कुळाची सत्ताधीशांशी माहिती मिळते. विहाराच्या शिल्पाची सालंकृत असलेला मुख्य दरवाजा सांचीच्या प्रवेश द्वारा सारखा दिसतो. या दरवाज्याच्या भिंतीस्तंभ सहा चौकोनांमध्ये विभागले असून, चौकोनात एक स्त्री-पुरुषाच्या युगलाची कथा शिल्पपठा द्वारे कथन केलेली आहे. हे जोडपे म्हणजे जणू गौतमी पुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. याच शिल्पात एक तरुण स्त्रीचा अनुनय करताना व पुढील शिल्पात तो तरुण तीला बळजबरीने उचलून नेताना दिसत आहे. पुढील शिल्पात दुसरा तरुण त्या तरुणा कडून स्त्रीला खेचून परत आणताना दिसत आहे. बंधुंनो, दरवाजाच्या तोरणावर बोधीवृक्ष स्तूप धम्माचे प्रतीके व त्यांची उपासना करणारे भिक्षु नागरिक दाखविले आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल उभे आहे. त्यांच्या वेशभूषेवरून तत्कालीन व समाजात वापरल्या जाणाऱ्या वस्त्र, आभूषणे यांची कल्पना येते. या विहारात सभागृह ४१ फुट रुंद आणि ४६ फुट लांब आयताकृती आहे. यात भिक्षूंच्या निवासासाठी १८ कक्ष निर्माण केले आहे. सभागृहाच्या समोरच्या भिंतीवर उठावदार स्तूप कोरलेले आहे. या स्तूपाच्या दोन्ही बाजूस स्त्री प्रतिमा आहे. वरच्या बाजूस हाती पुष्पमाला घेतलेला गंधर्व अवकाशित करीत आहे असे दाखविले आहे. स्तूपाच्या बाजूला धम्मचक्र, सिंह, तर स्तूपाच्या हर्मिकेला पाच छत्र कोरलेले आहे. गौतमी पुत्र विहाराच्या वरांड्यात सहा अष्टकोनी स्तंभ आहेत. हे स्तंभ खोदीव दगडी चौथाऱ्यावर उभे आहे. या स्तंभांची स्तंभशीर्षे हर्मिकेच्या प्रतिकृतीवर स्थिर आहे. हर्मिका अमलकारांच्या चारही कोनांवरील छोट्या यक्षांनी तोलून धरलेली आहे. व हे यक्ष स्तंभावर उलट्या घाटाच्या फुघीर भागावर उभे आहे. या स्तंभशीर्षावर पुढच्या बाजूने हत्तीवर बसलेला राज परिवार, व मागील बाजूस हत्ती, बैल सिंह, गरुडाचे मुख असलेला प्राणी इत्यादी कोरलेले आहेत. बंधुंनो, लेणी क्र. १० त्रीरेशमी लेणी हे नहपान विहार आहे. यात एक शिलालेख असून या विहारच्या शिर्षपट्टीवर अतिशय अलंकारी रचना केलेली आहे. हे विहार लेणी क्र. ३ च्या तुलतेन आकाराने छोटे व कमी अलंकृत आहे. या लेण्यांच्या दर्शनीय भागात सर्व स्तंभांच्या खालच्या बाजूला भारवाह यक्ष कोरलेले आहे. तर बंधुंनो, लेणी क्र. १० हे विदेशी क्षत्रप नहपान यांनी ख्रीस्ताब्द १२० मध्ये खोदुन घेतले आहे. हे विहार सभागृह ४३ फुट रुंद ४५ फुट लांब असे प्रशस्त आहे त्याला ३ दरवाजे आहे. आत तीन बाजूंना १८ खोल्या खोदलेल्या आहे. व समोरच्या भिंतीवर स्तुपाची रचना व आजूबाजूला दोन स्त्री साधकांच्या मुर्त्या असून मूळ स्तुपाची हर्मिका व तीन छत्र्या शाबूत आहेत. वरांड्यातील भिंतीवर शिलालेख कोरलेले असून एकूण ६ शिलालेख त्यापैकी तीन शिलालेख हे क्षत्रप नहपान राजाचे जावई व दिनिकाचा पुत्र उषवदत याने दिलेल्या दाना बद्दल आहे. **एका शिलालेखात क्षत्रपच्या सातवाहना वरील विजयाप्रीत्यर्थ याने भिकुंच्या अन्न, वस्त्र करिता तसेच लेणी विहार खोदण्याकरिता तीन हजार सुवर्ण नाणी दान दिल्याचा उल्लेख आहे**.


 तर बंधुंनो, त्रीरेशमी लेणी क्र. १७ हे विहार असून त्या विहारचे नमकरण यवन विहार असे करण्यात आलेले आहे. हे विहार ग्रीक वंशीय म्हणजेच यवन असलेल्या धम्मदेवाचा पुत्र इंद्राग्णीदत्त या भाविकाने कोरल्या म्हणून या विहाराला यवन विहार असे म्हटले जाते. दर्शनीय भागात चार अष्टकोनी स्तंभ स्तंभशीर्षावर हत्ती व स्वार कोरलेले आहेत. लेण्यांत शिलालेख असून लेणी व पाण्याची टाकी माता-पित्यांच्या स्मृती पित्यार्थ खोदुन ते संघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या विहारात दाभारा खोदण्याचे काम पूर्ण झाले असून दाभाऱ्यासमोर दोन्ही स्तंभांचे काम अर्धवट राहिलेले दिसते. स्तंभशीर्षावर हत्ती व माहूत व काही स्वार कोरलेले आहेत. दर्शनीय भिंतीवर एका बाजूला उभी बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे. 


बंधुंनो, त्रीरेशमी लेणी क्र. १९ एक कृष्ण विहार असून हे लेणे विहार लेणी क्र. २० च्या खालच्या तळमजल्यावर कोरलेले आहे. हे विहार एक छोट्या चौरस आकारचे विहार असून आत मध्ये ६ खोल्या खोदलेल्या आहे. सर्व खोल्यांच्या दरवाज्यावर पिंपळपाणाकृती व कमान व काही नक्षी कोरलेली आहे. प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूंना जाळीदार खिडक्या असून दरवाज्य समोरच्या वरांड्यात चौकोनी स्तंभ आहे. शिलालेख सातवाहन काळातील असून हे तळमजल्यावर कोरलेले विहार आहे.


 बंधूंनो , लिहिताना आता थांबावेसे वाटत नाही परंतु विहारांबद्दल म्हणायचे झाले तर आपण आपल्या गावामध्ये, खेड्यामध्ये शहरामध्ये, आता विहार बांधणे शक्य होऊ शकते, परंतु दगडामध्ये लेणी विहार चैत्यगृह कोरणे शक्य होणार नाही. ज्या लेण्या, विहारे, चैत्यगृह आपल्या पूर्वजांनी दान परिमिती बांधली आहे त्यांचा शोध घेवून त्यांचा अभ्यास करून गौरवशाली इतिहास आपल्या पिढीत आपल्याला पोहोचवायचा आहे. आपली पिढी शिकत आहे. पैसे कमवीत आहे. त्यामुळे आपण कितीही विहारे बांधू शकतो परंतु लेण्यांमधील विहारे चैत्यगृह यांची निर्मिती पुन्हा होणे शक्य नाही. म्हणून आपल्या डोंगर, दरीत जंगलात असलेल्या असंख्य लेण्यांवरील विहारांचा शोध घेऊन त्यांचा इतिहास जनमानसात पसरविणे हे आपण आपले कर्त्यव्य समजूया आणि हाच आजचा संकल्प करूया तर बंधुंनो, पुढील लेखात आपण स्तूप बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मूळलेख क्रमश ठेवून मी इथे थांबतो आणि पुन्हा एकदा आपण संकल्प करूया आपल्या राणा वनात, डोंगरदरीत, असलेल्या लेण्यांचा आणि विहारांचा शोध घेवून त्यांचा इतिहास आपण जनमानसात पसरवू.


**क्रमश**

**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



**लेख सहावा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**


बंधुंनो, मागच्या लेखात आपण लेणी मधील **चैत्यगृहाबद्दल** थोडक्यात माहिती पाहिली, कार्ले, त्रीरेशमी लेणी आणि कान्हेरी लेणी येथील असलेल्या चैत्यगृहाबद्दल संबंधित आपण अभ्यास केला. इंटरनेटच्या माध्यमातून चैत्यागृहाचे आपल्या धम्म बांधवांचे वेगवेगळ्या अँगंलने फोटो, विडीयो काढून अपलोड केलेले आहेत. तरी देखील आपण प्रत्येक्ष लेणीवर न जाता घरबसल्या अभ्यास कसा करू शकतो हे पाहिले. परंतु लेणीवर जाऊन अभ्यास करण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तर बंधुंनो, आपण प्रत्येक्ष लेणीवर जाऊन चैत्यगृहाचे सजावट, शिल्पे यांचा थोडक्यात अभ्यास करून आपण सर्वांनी संकल्प केला. निदान एक तरी शोध निबंध लिहू. तर बंधुंनो, आपण आपला गौरवशाली इतिहास जनामासात पसरवू. याचा प्रमुख क्रमश पाठ लेख सहावा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. त्याचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला आपण हातभार लावावा ही विनंती.


**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**


**लेख सहावा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**


बंधुंनो, सप्रेम जयभीम, या मालिकेतील सहावा लेख सुरु करताना मला अत्यंत अभिमानाने सागावेशे वाटते कि, लेणी संवर्धनाचे काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू, बघिनींनी आपले लेख हे ते मेंबर असलेल्या लेणी संबंधित फेसबुक पेज वरून, ग्रुप वरून, तसेच व्हॉटसपच्या ग्रुप वरून, मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केले आहेत. मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी दिलेल्या सहकार्य बद्दल लेणी संवर्धन समिती, दि ग्रेट अशोका आर्मी, त्यांची सदैव ऋणी राहील. माझे धम्म बांधव असेच सतत सहयोग माला देतील अशी अशा बाळगतो आणि आजचा मुख्य विषय सुरु करतो. बंधुंनो आज आपण आपल्या गावोगावी, आपल्या समाजाच्या काहिक लोकांनी एकत्रित येवून दान परीमितीने, गावागावात अत्यंत सुंदर सुशोभित अशी बुद्ध विहारे बांधली आहे. बंधुंनो १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे श्रीलंकेचे बौद्ध भिक्षु महास्तीवर चंद्रमणी यांच्या कडून आपल्या अनुयायींसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेथेच पुन्हा भारतात बौद्ध धम्माची पुनरुज्जीवन झाले. बंधुंनो, त्यानंतर आपली आज्जी, आजोबा, आई, वडील, यांनी बौद्ध धम्माची स्वीकार करून बौद्ध धम्माच्या रीतिरिवाजा प्रमाणे जीवन व्यथित केले. आपल्या गावात विहार व्हावे यासाठी पोटाला चिमटा काढून यथाशक्ती छोटे का होईना परंतु गावात विहार बांधू असे संकल्प करून आपल्या गावांमध्ये विहाराची छोटी का होईना पण बांधणी केली, आज आपण आपल्या गावातली विहारांची बांधणी धर्मांतराच्या क्रांतिकारी निर्णयानंतर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दोन हजार पाचशे वर्षापूर्वीच्या या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे हक्कदार बनविलेआहे. आज मला सांगताना खुप खेद होतो, आपल्या गावातील विहारांमध्ये मोठी मोठी टाळी लागली आहे. गावातील किंवा चाळीतील, शहरातील काहिक लोकांची मक्तेदारी असल्यासारखे ती विहारे स्वताचा कब्जात ठेवण्याकरिता आपापसात संघर्ष चालू आहे. असो, बंधुंनो तो विषय येथे आज अभ्यासात नाही. परंतु आज आपण लेण्यांमधील विहारांबद्दल बोलणार आहोत.


बंधुंनो, पाली भाषेत विहार हा शब्द आराम या आर्थी वापरलेला आहे. भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायी (भिक्षुंना) धम्म प्रचारासाठी चारही दिशांनी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भिक्षु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत त्या ठिकाणांना विहार असे म्हणत. सुरुवातीच्या काळात अशा विहारांमध्ये एकच दालन (खोली) असे व तिच्या पुढे वरंडा असून, भिक्षूंची संख्या वाढल्यानंतर हळूहळू त्यांचा विस्तार होऊन त्यात आणखी दालनांची (खोल्यांची) भर पडली. आणि मोठे मोठे मंडप कोरण्यात येवू लागले. काहिक लेण्यांमध्ये मंडपांच्या दोन्ही बाजूच्या भिंती दालन (खोल्या) काढण्यात आल्या तसेच मंडपाच्या आकार मनानुसार आधारा करता काही अंतरावर समांतर असे स्तंभ कोरून त्या स्तंभांवर विविध वेलपत्तींनी, शिल्पांनी, स्तंभशिर्षांनी, चित्रांनी भूषविण्याची पद्धत पडली.


 बंधुंनो, आपण मोठ्या मोठ्या लेण्यांमध्ये गेल्यानंतर जे मोठे कोरीव मंडप आणि ताच्या आजूबाजूला असलेले खोल्या हे आपण पाहिलेले आहे.


 उदाहरणार्थी कार्ले नशिक, अजिंठा, व वेरूळ येथील मंडपांचे स्तंभ अलंकृत केलेले आहे. सुरुवातीच्या दिवसात कोरलेले विहारे आणि काढलेल्या आकृती बोधिवृक्ष, चक्र, पादुका इत्यादी प्रतीकात्मक चिन्हाने भगवान बुद्धांचे अस्तित्व सूचित केले आहे. महायान पंथाच्या उद्या नंतर विहारात मूर्ती शिल्पांना महत्व प्राप्त झाले आणि जातक कथातून बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग शिल्पाकिंक करण्यात आले. 


बंधुंनो, विहारांची साधारण रचना कान्हेरी लेणी मध्ये आपण पाहिली असता, लेणी क्र. ६७, कान्हेरी लेणी अत्यंत महत्वाची आहे. ओसरीच्या बाहेरच्या बाजूची कोरलेले खांब ओसरीच्या आतमध्ये सभा मंडप आणि त्याच्या आतमध्ये कोरलेले विश्राम कक्ष अशी ही कान्हेरी लेणीमध्ये रचना दिसून येते. हे विहार बुद्ध प्रतिमाने अक्षरशा भरून गेलेले आहे. जिकडे बघावे तिकडे प्रतिमा कोरलेल्या आहे. या विहाराचे निरीक्षण केले असता, तथागत बुद्ध सिहसनावर बसलेल्या चौरंगावर तर कधी पद्मासन घालून बसलेले, तर अवलौकिकतेश्वराच्या प्रतिमेत आशीर्वाद मुद्रेत, तर कधी कमळावर तर कधी पद्मपाणी बोधीसत्वाच्या रुपात ध्यानस्त. तसेच नंद आणि उपनंद ही दोन नाग शिष्ये कमळाच्या देठाना आधार देतना दिसतात.


कान्हेरी येथील ८९/९० क्रमांकाची विहार अत्यंत विशिष्टपूर्ण आहे. तेथील ओसरीत स्तंभावर कलाकुसार केलेली आहे. ओसरीतील कोपऱ्यात, तसेच विहारातील कोरीव बुद्ध प्रतिमा स्तूप प्रतीकांसह कोरलेले आहेत. विहारांमध्ये जाण्याकरिता कातळाचा जिना कोरलेला आहे. विहाराच्या बाजूला पाण्याचा साठा असलेली पाण्याची टाकी अंतर्गत कोरलेली आहे. विहाराच्या ओसरीच्या बाहेर हाताने पाणी काढता येईल अशी सोय केली आहे. लेणी क्रमांक ३४ हे कान्हेरी येथील विहार आहे. तेथे ओसरीत बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. तेथे अंतर्भागातील छतावर लक्षपूर्वक पाहिले असता. बोद्धीसत्वांचे एक अपूर्ण चित्र रंगविलेले दिसून येते. ध्यानस्त बसलेला बुद्धांचा चेहरा अपूर्ण अवस्थेत त्यांच्या आजूबाजूला नक्षीदार स्तंभ बाजूला सेवक वेलबुटीची नक्षी असे सोळाशे ते सतराशे वर्ष जुने चित्र अपूर्ण अवस्थेत सुव्यवस्थित आहे. बाजूला शिलालेख कोरलेला असून सातवाहन वंशीय माढरीपुत्र यांचा आहे. कान्हेरी लेणीमध्ये एक मोठे विहार कोरलेले असून त्या विहाराचा उपयोग बौद्ध भिक्षुंसाठी भोजनालय प्रमाणे करीत असल्याचे दिसून येते. त्या विहारात ताटे ठेवण्यासठी समांतर रांगेत उंच व त्याच्या दोन सपाट लाद्या कोरलेल्या आहे. आतल्या बाजूला बहुदा शीला ठेवण्याचे कक्ष कोरलेले आहेत. कान्हेरी लेणी १०९ लेण्यांच्या समूहातून त्यापैकी एक चैत्यगृह आहे. व १०८ हीनयान, महायान कालखंडातील विभन्न दात्यांनी दिलेल्या दानांनी कोरलेली विहारे आहेत. बंधुंनो, कान्हेरी लेणी क्र. १ हे दुमजली विहार आहे. 


बंधुंनो, आपणास प्रामुख्याने अभ्यास करण्याकरिता येथे त्रीरेशमी लेणी येथे आढळून आलेले विहारांबद्दल थोडक्यात माहिती देत आहे. त्रीरेशमी लेणी २४ लेण्यांच्या समूह असून त्या पैकी एक चैत्यगृह आहे, आणि बाकी सर्व विहारे आहेत. प्रामुख्याने त्रीरेशमी लेणीमध्ये आता आणखी तीन विहारांची भर पडली असून आपण सर्वजन सर्व वृत्त पत्रातून ही बातमी वाचत आहोत. बंधुंनो, लेणी क्र. ३ त्रीरेशमी लेणी ही अभ्यासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची आहे. लेणी क्र. ३ ला गौतमीपुत्र विहार असे संबोधले जाते. सातवाहन कुळातील महान सम्राट गौतमीपुत्र सात कर्नेची आई राणी गौतमी बळश्री हिने त्याच्या मृत्यूनंतर लेणी, विहार कोरले व धम्म संघाला स्मृतीप्रीत्यर्थ अर्पण केले. या लेणीला देवीची लेणी किंवा राणीची लेणी म्हणून ओळखले जाते. या लेण्यांत असलेल्या शिलालेखात सातवाहनाच्या कुळाची सत्ताधीशांशी माहिती मिळते. विहाराच्या शिल्पाची सालंकृत असलेला मुख्य दरवाजा सांचीच्या प्रवेश द्वारा सारखा दिसतो. या दरवाज्याच्या भिंतीस्तंभ सहा चौकोनांमध्ये विभागले असून, चौकोनात एक स्त्री-पुरुषाच्या युगलाची कथा शिल्पपठा द्वारे कथन केलेली आहे. हे जोडपे म्हणजे जणू गौतमी पुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. याच शिल्पात एक तरुण स्त्रीचा अनुनय करताना व पुढील शिल्पात तो तरुण तीला बळजबरीने उचलून नेताना दिसत आहे. पुढील शिल्पात दुसरा तरुण त्या तरुणा कडून स्त्रीला खेचून परत आणताना दिसत आहे. बंधुंनो, दरवाजाच्या तोरणावर बोधीवृक्ष स्तूप धम्माचे प्रतीके व त्यांची उपासना करणारे भिक्षु नागरिक दाखविले आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल उभे आहे. त्यांच्या वेशभूषेवरून तत्कालीन व समाजात वापरल्या जाणाऱ्या वस्त्र, आभूषणे यांची कल्पना येते. या विहारात सभागृह ४१ फुट रुंद आणि ४६ फुट लांब आयताकृती आहे. यात भिक्षूंच्या निवासासाठी १८ कक्ष निर्माण केले आहे. सभागृहाच्या समोरच्या भिंतीवर उठावदार स्तूप कोरलेले आहे. या स्तूपाच्या दोन्ही बाजूस स्त्री प्रतिमा आहे. वरच्या बाजूस हाती पुष्पमाला घेतलेला गंधर्व अवकाशित करीत आहे असे दाखविले आहे. स्तूपाच्या बाजूला धम्मचक्र, सिंह, तर स्तूपाच्या हर्मिकेला पाच छत्र कोरलेले आहे. गौतमी पुत्र विहाराच्या वरांड्यात सहा अष्टकोनी स्तंभ आहेत. हे स्तंभ खोदीव दगडी चौथाऱ्यावर उभे आहे. या स्तंभांची स्तंभशीर्षे हर्मिकेच्या प्रतिकृतीवर स्थिर आहे. हर्मिका अमलकारांच्या चारही कोनांवरील छोट्या यक्षांनी तोलून धरलेली आहे. व हे यक्ष स्तंभावर उलट्या घाटाच्या फुघीर भागावर उभे आहे. या स्तंभशीर्षावर पुढच्या बाजूने हत्तीवर बसलेला राज परिवार, व मागील बाजूस हत्ती, बैल सिंह, गरुडाचे मुख असलेला प्राणी इत्यादी कोरलेले आहेत. बंधुंनो, लेणी क्र. १० त्रीरेशमी लेणी हे नहपान विहार आहे. यात एक शिलालेख असून या विहारच्या शिर्षपट्टीवर अतिशय अलंकारी रचना केलेली आहे. हे विहार लेणी क्र. ३ च्या तुलतेन आकाराने छोटे व कमी अलंकृत आहे. या लेण्यांच्या दर्शनीय भागात सर्व स्तंभांच्या खालच्या बाजूला भारवाह यक्ष कोरलेले आहे. तर बंधुंनो, लेणी क्र. १० हे विदेशी क्षत्रप नहपान यांनी ख्रीस्ताब्द १२० मध्ये खोदुन घेतले आहे. हे विहार सभागृह ४३ फुट रुंद ४५ फुट लांब असे प्रशस्त आहे त्याला ३ दरवाजे आहे. आत तीन बाजूंना १८ खोल्या खोदलेल्या आहे. व समोरच्या भिंतीवर स्तुपाची रचना व आजूबाजूला दोन स्त्री साधकांच्या मुर्त्या असून मूळ स्तुपाची हर्मिका व तीन छत्र्या शाबूत आहेत. वरांड्यातील भिंतीवर शिलालेख कोरलेले असून एकूण ६ शिलालेख त्यापैकी तीन शिलालेख हे क्षत्रप नहपान राजाचे जावई व दिनिकाचा पुत्र उषवदत याने दिलेल्या दाना बद्दल आहे. **एका शिलालेखात क्षत्रपच्या सातवाहना वरील विजयाप्रीत्यर्थ याने भिकुंच्या अन्न, वस्त्र करिता तसेच लेणी विहार खोदण्याकरिता तीन हजार सुवर्ण नाणी दान दिल्याचा उल्लेख आहे**.


 तर बंधुंनो, त्रीरेशमी लेणी क्र. १७ हे विहार असून त्या विहारचे नमकरण यवन विहार असे करण्यात आलेले आहे. हे विहार ग्रीक वंशीय म्हणजेच यवन असलेल्या धम्मदेवाचा पुत्र इंद्राग्णीदत्त या भाविकाने कोरल्या म्हणून या विहाराला यवन विहार असे म्हटले जाते. दर्शनीय भागात चार अष्टकोनी स्तंभ स्तंभशीर्षावर हत्ती व स्वार कोरलेले आहेत. लेण्यांत शिलालेख असून लेणी व पाण्याची टाकी माता-पित्यांच्या स्मृती पित्यार्थ खोदुन ते संघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या विहारात दाभारा खोदण्याचे काम पूर्ण झाले असून दाभाऱ्यासमोर दोन्ही स्तंभांचे काम अर्धवट राहिलेले दिसते. स्तंभशीर्षावर हत्ती व माहूत व काही स्वार कोरलेले आहेत. दर्शनीय भिंतीवर एका बाजूला उभी बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे. 


बंधुंनो, त्रीरेशमी लेणी क्र. १९ एक कृष्ण विहार असून हे लेणे विहार लेणी क्र. २० च्या खालच्या तळमजल्यावर कोरलेले आहे. हे विहार एक छोट्या चौरस आकारचे विहार असून आत मध्ये ६ खोल्या खोदलेल्या आहे. सर्व खोल्यांच्या दरवाज्यावर पिंपळपाणाकृती व कमान व काही नक्षी कोरलेली आहे. प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूंना जाळीदार खिडक्या असून दरवाज्य समोरच्या वरांड्यात चौकोनी स्तंभ आहे. शिलालेख सातवाहन काळातील असून हे तळमजल्यावर कोरलेले विहार आहे.


 बंधूंनो , लिहिताना आता थांबावेसे वाटत नाही परंतु विहारांबद्दल म्हणायचे झाले तर आपण आपल्या गावामध्ये, खेड्यामध्ये शहरामध्ये, आता विहार बांधणे शक्य होऊ शकते, परंतु दगडामध्ये लेणी विहार चैत्यगृह कोरणे शक्य होणार नाही. ज्या लेण्या, विहारे, चैत्यगृह आपल्या पूर्वजांनी दान परिमिती बांधली आहे त्यांचा शोध घेवून त्यांचा अभ्यास करून गौरवशाली इतिहास आपल्या पिढीत आपल्याला पोहोचवायचा आहे. आपली पिढी शिकत आहे. पैसे कमवीत आहे. त्यामुळे आपण कितीही विहारे बांधू शकतो परंतु लेण्यांमधील विहारे चैत्यगृह यांची निर्मिती पुन्हा होणे शक्य नाही. म्हणून आपल्या डोंगर, दरीत जंगलात असलेल्या असंख्य लेण्यांवरील विहारांचा शोध घेऊन त्यांचा इतिहास जनमानसात पसरविणे हे आपण आपले कर्त्यव्य समजूया आणि हाच आजचा संकल्प करूया तर बंधुंनो, पुढील लेखात आपण स्तूप बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मूळलेख क्रमश ठेवून मी इथे थांबतो आणि पुन्हा एकदा आपण संकल्प करूया आपल्या राणा वनात, डोंगरदरीत, असलेल्या लेण्यांचा आणि विहारांचा शोध घेवून त्यांचा इतिहास आपण जनमानसात पसरवू.


**क्रमश**

**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,****लेख सहावा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**


बंधुंनो, मागच्या लेखात आपण लेणी मधील **चैत्यगृहाबद्दल** थोडक्यात माहिती पाहिली, कार्ले, त्रीरेशमी लेणी आणि कान्हेरी लेणी येथील असलेल्या चैत्यगृहाबद्दल संबंधित आपण अभ्यास केला. इंटरनेटच्या माध्यमातून चैत्यागृहाचे आपल्या धम्म बांधवांचे वेगवेगळ्या अँगंलने फोटो, विडीयो काढून अपलोड केलेले आहेत. तरी देखील आपण प्रत्येक्ष लेणीवर न जाता घरबसल्या अभ्यास कसा करू शकतो हे पाहिले. परंतु लेणीवर जाऊन अभ्यास करण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तर बंधुंनो, आपण प्रत्येक्ष लेणीवर जाऊन चैत्यगृहाचे सजावट, शिल्पे यांचा थोडक्यात अभ्यास करून आपण सर्वांनी संकल्प केला. निदान एक तरी शोध निबंध लिहू. तर बंधुंनो, आपण आपला गौरवशाली इतिहास जनामासात पसरवू. याचा प्रमुख क्रमश पाठ लेख सहावा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. त्याचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला आपण हातभार लावावा ही विनंती.


**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**


**लेख सहावा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**


बंधुंनो, सप्रेम जयभीम, या मालिकेतील सहावा लेख सुरु करताना मला अत्यंत अभिमानाने सागावेशे वाटते कि, लेणी संवर्धनाचे काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू, बघिनींनी आपले लेख हे ते मेंबर असलेल्या लेणी संबंधित फेसबुक पेज वरून, ग्रुप वरून, तसेच व्हॉटसपच्या ग्रुप वरून, मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केले आहेत. मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी दिलेल्या सहकार्य बद्दल लेणी संवर्धन समिती, दि ग्रेट अशोका आर्मी, त्यांची सदैव ऋणी राहील. माझे धम्म बांधव असेच सतत सहयोग माला देतील अशी अशा बाळगतो आणि आजचा मुख्य विषय सुरु करतो. बंधुंनो आज आपण आपल्या गावोगावी, आपल्या समाजाच्या काहिक लोकांनी एकत्रित येवून दान परीमितीने, गावागावात अत्यंत सुंदर सुशोभित अशी बुद्ध विहारे बांधली आहे. बंधुंनो १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे श्रीलंकेचे बौद्ध भिक्षु महास्तीवर चंद्रमणी यांच्या कडून आपल्या अनुयायींसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेथेच पुन्हा भारतात बौद्ध धम्माची पुनरुज्जीवन झाले. बंधुंनो, त्यानंतर आपली आज्जी, आजोबा, आई, वडील, यांनी बौद्ध धम्माची स्वीकार करून बौद्ध धम्माच्या रीतिरिवाजा प्रमाणे जीवन व्यथित केले. आपल्या गावात विहार व्हावे यासाठी पोटाला चिमटा काढून यथाशक्ती छोटे का होईना परंतु गावात विहार बांधू असे संकल्प करून आपल्या गावांमध्ये विहाराची छोटी का होईना पण बांधणी केली, आज आपण आपल्या गावातली विहारांची बांधणी धर्मांतराच्या क्रांतिकारी निर्णयानंतर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दोन हजार पाचशे वर्षापूर्वीच्या या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे हक्कदार बनविलेआहे. आज मला सांगताना खुप खेद होतो, आपल्या गावातील विहारांमध्ये मोठी मोठी टाळी लागली आहे. गावातील किंवा चाळीतील, शहरातील काहिक लोकांची मक्तेदारी असल्यासारखे ती विहारे स्वताचा कब्जात ठेवण्याकरिता आपापसात संघर्ष चालू आहे. असो, बंधुंनो तो विषय येथे आज अभ्यासात नाही. परंतु आज आपण लेण्यांमधील विहारांबद्दल बोलणार आहोत.


बंधुंनो, पाली भाषेत विहार हा शब्द आराम या आर्थी वापरलेला आहे. भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायी (भिक्षुंना) धम्म प्रचारासाठी चारही दिशांनी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भिक्षु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत त्या ठिकाणांना विहार असे म्हणत. सुरुवातीच्या काळात अशा विहारांमध्ये एकच दालन (खोली) असे व तिच्या पुढे वरंडा असून, भिक्षूंची संख्या वाढल्यानंतर हळूहळू त्यांचा विस्तार होऊन त्यात आणखी दालनांची (खोल्यांची) भर पडली. आणि मोठे मोठे मंडप कोरण्यात येवू लागले. काहिक लेण्यांमध्ये मंडपांच्या दोन्ही बाजूच्या भिंती दालन (खोल्या) काढण्यात आल्या तसेच मंडपाच्या आकार मनानुसार आधारा करता काही अंतरावर समांतर असे स्तंभ कोरून त्या स्तंभांवर विविध वेलपत्तींनी, शिल्पांनी, स्तंभशिर्षांनी, चित्रांनी भूषविण्याची पद्धत पडली.


 बंधुंनो, आपण मोठ्या मोठ्या लेण्यांमध्ये गेल्यानंतर जे मोठे कोरीव मंडप आणि ताच्या आजूबाजूला असलेले खोल्या हे आपण पाहिलेले आहे.


 उदाहरणार्थी कार्ले नशिक, अजिंठा, व वेरूळ येथील मंडपांचे स्तंभ अलंकृत केलेले आहे. सुरुवातीच्या दिवसात कोरलेले विहारे आणि काढलेल्या आकृती बोधिवृक्ष, चक्र, पादुका इत्यादी प्रतीकात्मक चिन्हाने भगवान बुद्धांचे अस्तित्व सूचित केले आहे. महायान पंथाच्या उद्या नंतर विहारात मूर्ती शिल्पांना महत्व प्राप्त झाले आणि जातक कथातून बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग शिल्पाकिंक करण्यात आले. 


बंधुंनो, विहारांची साधारण रचना कान्हेरी लेणी मध्ये आपण पाहिली असता, लेणी क्र. ६७, कान्हेरी लेणी अत्यंत महत्वाची आहे. ओसरीच्या बाहेरच्या बाजूची कोरलेले खांब ओसरीच्या आतमध्ये सभा मंडप आणि त्याच्या आतमध्ये कोरलेले विश्राम कक्ष अशी ही कान्हेरी लेणीमध्ये रचना दिसून येते. हे विहार बुद्ध प्रतिमाने अक्षरशा भरून गेलेले आहे. जिकडे बघावे तिकडे प्रतिमा कोरलेल्या आहे. या विहाराचे निरीक्षण केले असता, तथागत बुद्ध सिहसनावर बसलेल्या चौरंगावर तर कधी पद्मासन घालून बसलेले, तर अवलौकिकतेश्वराच्या प्रतिमेत आशीर्वाद मुद्रेत, तर कधी कमळावर तर कधी पद्मपाणी बोधीसत्वाच्या रुपात ध्यानस्त. तसेच नंद आणि उपनंद ही दोन नाग शिष्ये कमळाच्या देठाना आधार देतना दिसतात.


कान्हेरी येथील ८९/९० क्रमांकाची विहार अत्यंत विशिष्टपूर्ण आहे. तेथील ओसरीत स्तंभावर कलाकुसार केलेली आहे. ओसरीतील कोपऱ्यात, तसेच विहारातील कोरीव बुद्ध प्रतिमा स्तूप प्रतीकांसह कोरलेले आहेत. विहारांमध्ये जाण्याकरिता कातळाचा जिना कोरलेला आहे. विहाराच्या बाजूला पाण्याचा साठा असलेली पाण्याची टाकी अंतर्गत कोरलेली आहे. विहाराच्या ओसरीच्या बाहेर हाताने पाणी काढता येईल अशी सोय केली आहे. लेणी क्रमांक ३४ हे कान्हेरी येथील विहार आहे. तेथे ओसरीत बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. तेथे अंतर्भागातील छतावर लक्षपूर्वक पाहिले असता. बोद्धीसत्वांचे एक अपूर्ण चित्र रंगविलेले दिसून येते. ध्यानस्त बसलेला बुद्धांचा चेहरा अपूर्ण अवस्थेत त्यांच्या आजूबाजूला नक्षीदार स्तंभ बाजूला सेवक वेलबुटीची नक्षी असे सोळाशे ते सतराशे वर्ष जुने चित्र अपूर्ण अवस्थेत सुव्यवस्थित आहे. बाजूला शिलालेख कोरलेला असून सातवाहन वंशीय माढरीपुत्र यांचा आहे. कान्हेरी लेणीमध्ये एक मोठे विहार कोरलेले असून त्या विहाराचा उपयोग बौद्ध भिक्षुंसाठी भोजनालय प्रमाणे करीत असल्याचे दिसून येते. त्या विहारात ताटे ठेवण्यासठी समांतर रांगेत उंच व त्याच्या दोन सपाट लाद्या कोरलेल्या आहे. आतल्या बाजूला बहुदा शीला ठेवण्याचे कक्ष कोरलेले आहेत. कान्हेरी लेणी १०९ लेण्यांच्या समूहातून त्यापैकी एक चैत्यगृह आहे. व १०८ हीनयान, महायान कालखंडातील विभन्न दात्यांनी दिलेल्या दानांनी कोरलेली विहारे आहेत. बंधुंनो, कान्हेरी लेणी क्र. १ हे दुमजली विहार आहे. 


बंधुंनो, आपणास प्रामुख्याने अभ्यास करण्याकरिता येथे त्रीरेशमी लेणी येथे आढळून आलेले विहारांबद्दल थोडक्यात माहिती देत आहे. त्रीरेशमी लेणी २४ लेण्यांच्या समूह असून त्या पैकी एक चैत्यगृह आहे, आणि बाकी सर्व विहारे आहेत. प्रामुख्याने त्रीरेशमी लेणीमध्ये आता आणखी तीन विहारांची भर पडली असून आपण सर्वजन सर्व वृत्त पत्रातून ही बातमी वाचत आहोत. बंधुंनो, लेणी क्र. ३ त्रीरेशमी लेणी ही अभ्यासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची आहे. लेणी क्र. ३ ला गौतमीपुत्र विहार असे संबोधले जाते. सातवाहन कुळातील महान सम्राट गौतमीपुत्र सात कर्नेची आई राणी गौतमी बळश्री हिने त्याच्या मृत्यूनंतर लेणी, विहार कोरले व धम्म संघाला स्मृतीप्रीत्यर्थ अर्पण केले. या लेणीला देवीची लेणी किंवा राणीची लेणी म्हणून ओळखले जाते. या लेण्यांत असलेल्या शिलालेखात सातवाहनाच्या कुळाची सत्ताधीशांशी माहिती मिळते. विहाराच्या शिल्पाची सालंकृत असलेला मुख्य दरवाजा सांचीच्या प्रवेश द्वारा सारखा दिसतो. या दरवाज्याच्या भिंतीस्तंभ सहा चौकोनांमध्ये विभागले असून, चौकोनात एक स्त्री-पुरुषाच्या युगलाची कथा शिल्पपठा द्वारे कथन केलेली आहे. हे जोडपे म्हणजे जणू गौतमी पुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. याच शिल्पात एक तरुण स्त्रीचा अनुनय करताना व पुढील शिल्पात तो तरुण तीला बळजबरीने उचलून नेताना दिसत आहे. पुढील शिल्पात दुसरा तरुण त्या तरुणा कडून स्त्रीला खेचून परत आणताना दिसत आहे. बंधुंनो, दरवाजाच्या तोरणावर बोधीवृक्ष स्तूप धम्माचे प्रतीके व त्यांची उपासना करणारे भिक्षु नागरिक दाखविले आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल उभे आहे. त्यांच्या वेशभूषेवरून तत्कालीन व समाजात वापरल्या जाणाऱ्या वस्त्र, आभूषणे यांची कल्पना येते. या विहारात सभागृह ४१ फुट रुंद आणि ४६ फुट लांब आयताकृती आहे. यात भिक्षूंच्या निवासासाठी १८ कक्ष निर्माण केले आहे. सभागृहाच्या समोरच्या भिंतीवर उठावदार स्तूप कोरलेले आहे. या स्तूपाच्या दोन्ही बाजूस स्त्री प्रतिमा आहे. वरच्या बाजूस हाती पुष्पमाला घेतलेला गंधर्व अवकाशित करीत आहे असे दाखविले आहे. स्तूपाच्या बाजूला धम्मचक्र, सिंह, तर स्तूपाच्या हर्मिकेला पाच छत्र कोरलेले आहे. गौतमी पुत्र विहाराच्या वरांड्यात सहा अष्टकोनी स्तंभ आहेत. हे स्तंभ खोदीव दगडी चौथाऱ्यावर उभे आहे. या स्तंभांची स्तंभशीर्षे हर्मिकेच्या प्रतिकृतीवर स्थिर आहे. हर्मिका अमलकारांच्या चारही कोनांवरील छोट्या यक्षांनी तोलून धरलेली आहे. व हे यक्ष स्तंभावर उलट्या घाटाच्या फुघीर भागावर उभे आहे. या स्तंभशीर्षावर पुढच्या बाजूने हत्तीवर बसलेला राज परिवार, व मागील बाजूस हत्ती, बैल सिंह, गरुडाचे मुख असलेला प्राणी इत्यादी कोरलेले आहेत. बंधुंनो, लेणी क्र. १० त्रीरेशमी लेणी हे नहपान विहार आहे. यात एक शिलालेख असून या विहारच्या शिर्षपट्टीवर अतिशय अलंकारी रचना केलेली आहे. हे विहार लेणी क्र. ३ च्या तुलतेन आकाराने छोटे व कमी अलंकृत आहे. या लेण्यांच्या दर्शनीय भागात सर्व स्तंभांच्या खालच्या बाजूला भारवाह यक्ष कोरलेले आहे. तर बंधुंनो, लेणी क्र. १० हे विदेशी क्षत्रप नहपान यांनी ख्रीस्ताब्द १२० मध्ये खोदुन घेतले आहे. हे विहार सभागृह ४३ फुट रुंद ४५ फुट लांब असे प्रशस्त आहे त्याला ३ दरवाजे आहे. आत तीन बाजूंना १८ खोल्या खोदलेल्या आहे. व समोरच्या भिंतीवर स्तुपाची रचना व आजूबाजूला दोन स्त्री साधकांच्या मुर्त्या असून मूळ स्तुपाची हर्मिका व तीन छत्र्या शाबूत आहेत. वरांड्यातील भिंतीवर शिलालेख कोरलेले असून एकूण ६ शिलालेख त्यापैकी तीन शिलालेख हे क्षत्रप नहपान राजाचे जावई व दिनिकाचा पुत्र उषवदत याने दिलेल्या दाना बद्दल आहे. **एका शिलालेखात क्षत्रपच्या सातवाहना वरील विजयाप्रीत्यर्थ याने भिकुंच्या अन्न, वस्त्र करिता तसेच लेणी विहार खोदण्याकरिता तीन हजार सुवर्ण नाणी दान दिल्याचा उल्लेख आहे**.


 तर बंधुंनो, त्रीरेशमी लेणी क्र. १७ हे विहार असून त्या विहारचे नमकरण यवन विहार असे करण्यात आलेले आहे. हे विहार ग्रीक वंशीय म्हणजेच यवन असलेल्या धम्मदेवाचा पुत्र इंद्राग्णीदत्त या भाविकाने कोरल्या म्हणून या विहाराला यवन विहार असे म्हटले जाते. दर्शनीय भागात चार अष्टकोनी स्तंभ स्तंभशीर्षावर हत्ती व स्वार कोरलेले आहेत. लेण्यांत शिलालेख असून लेणी व पाण्याची टाकी माता-पित्यांच्या स्मृती पित्यार्थ खोदुन ते संघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या विहारात दाभारा खोदण्याचे काम पूर्ण झाले असून दाभाऱ्यासमोर दोन्ही स्तंभांचे काम अर्धवट राहिलेले दिसते. स्तंभशीर्षावर हत्ती व माहूत व काही स्वार कोरलेले आहेत. दर्शनीय भिंतीवर एका बाजूला उभी बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे. 


बंधुंनो, त्रीरेशमी लेणी क्र. १९ एक कृष्ण विहार असून हे लेणे विहार लेणी क्र. २० च्या खालच्या तळमजल्यावर कोरलेले आहे. हे विहार एक छोट्या चौरस आकारचे विहार असून आत मध्ये ६ खोल्या खोदलेल्या आहे. सर्व खोल्यांच्या दरवाज्यावर पिंपळपाणाकृती व कमान व काही नक्षी कोरलेली आहे. प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूंना जाळीदार खिडक्या असून दरवाज्य समोरच्या वरांड्यात चौकोनी स्तंभ आहे. शिलालेख सातवाहन काळातील असून हे तळमजल्यावर कोरलेले विहार आहे.


 बंधूंनो , लिहिताना आता थांबावेसे वाटत नाही परंतु विहारांबद्दल म्हणायचे झाले तर आपण आपल्या गावामध्ये, खेड्यामध्ये शहरामध्ये, आता विहार बांधणे शक्य होऊ शकते, परंतु दगडामध्ये लेणी विहार चैत्यगृह कोरणे शक्य होणार नाही. ज्या लेण्या, विहारे, चैत्यगृह आपल्या पूर्वजांनी दान परिमिती बांधली आहे त्यांचा शोध घेवून त्यांचा अभ्यास करून गौरवशाली इतिहास आपल्या पिढीत आपल्याला पोहोचवायचा आहे. आपली पिढी शिकत आहे. पैसे कमवीत आहे. त्यामुळे आपण कितीही विहारे बांधू शकतो परंतु लेण्यांमधील विहारे चैत्यगृह यांची निर्मिती पुन्हा होणे शक्य नाही. म्हणून आपल्या डोंगर, दरीत जंगलात असलेल्या असंख्य लेण्यांवरील विहारांचा शोध घेऊन त्यांचा इतिहास जनमानसात पसरविणे हे आपण आपले कर्त्यव्य समजूया आणि हाच आजचा संकल्प करूया तर बंधुंनो, पुढील लेखात आपण स्तूप बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मूळलेख क्रमश ठेवून मी इथे थांबतो आणि पुन्हा एकदा आपण संकल्प करूया आपल्या राणा वनात, डोंगरदरीत, असलेल्या लेण्यांचा आणि विहारांचा शोध घेवून त्यांचा इतिहास आपण जनमानसात पसरवू.


**क्रमश**

**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**

**दि ग्रेट अशोका आर्मी**🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


**लेख सातवा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**

बंधुंनो, मागील लेखात आपण लेण्यांमध्ये असलेल्या विहाराबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. आज आपण आपल्या गावोगावी बुद्ध विहारे बांधू शकतो, परंतु लेण्यांमध्ये असलेले विहार आपल्याला कोरणे, बांधणे शक्य नाही, हे जरी तेवढेच खरे असले तरी आपल्या पूर्वजांनी राणावनात, जंगलात, डोंगरात, पर्वतावर असंख्य लेण्या कोरल्या आहेत, त्यांचा शोध घेवून त्या लेण्यांचे जतन, अभ्यास, संवर्धन, संशोधन करणे अत्यंत गरजेचे आहे, हे आपण मागील लेखात पाहिले. तसेच मागील लेखात त्रीरेशमी लेणी येथे असलेल्या लेणीमधील विहाराचा अभ्यास केला होता, आणि संकल्प केला होता. राणावनात, डोंगर दरीत असलेल्या लेणींचा आणि विहारांचा शोध घेवून आपल्याला गौरवशाली इतिहास जनमाणसांमध्ये पोचवू, तर बंधुंनो, याचा क्रमश पाठ लेख सातवा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. याचा आपण सर्वांना जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला हात भार लावावा ही विनंती. 

**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**


**लेख सातवा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**


बंधुंनो सप्रेम जयभीम, विषय सुरु करण्यापूर्वी मला आवर्जून सांगावेशे वाटते कि, **डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना सन १९५४ साली बर्मा देशाची राजधानी रंगून येथे शष्टम् संगीती मध्ये निमंत्रित केले होते. त्यांचे संगीतीत प्रारंभिक भाषण झाले, त्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “बर्मा देशात जरी परंपरागत धम्म असला तरी त्यांच्या शासनाची चिन्हे मात्र आजही अबौद्ध आहेत. पण भारतात जरी बौद्ध आज येवढा दिसत नाही, तरी भारतात शासण मात्र बौद्धच आहे. कारण आजही भारताच्या राष्ट्रध्वजावर “धम्मचक्र” अंकित आहे. म्हणजेच आजही भारताचा राष्ट्रीय धम्म बौद्धच आहे. शासनाचे चिन्ह पण महाराजा धम्मशोकाच्या स्तंभावरील बौद्ध चिन्ह चार मुखी सिंह बुद्ध प्रतिक आहे. आमच्या शासनाचे चिन्ह तसेच आमच्या पैश्यावर, रुपयावर पण तेच आहे. म्हणून भारतात आजही बौद्ध धम्माचेच राज आहे. इतकेच कशाला ज्या ठिकाणी आमच्या देशाचा प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपती बसतो त्याच्या डोक्यावरच “बहुजन हिताय, बहुजन सुखाय”, लिहिलेले आहे. आणि तथागतांच्या धम्माचा आदर्श आहे. पण मला कोणत्याही बौद्ध राष्ट्रात मात्र त्यांचे राष्ट्रीय चिन्ह अबौद्धच दिसते, यावरून ते बौद्ध असूनही त्यांचे राष्ट्र अबौद्धच आहे. असे म्हणता येईल”.** तर बंधुंनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या आधीच बर्मा येथे केलेल्या भाषणात स्वातंत्र्य भारत हा कसा बौद्ध राष्ट्र आहे हे सांगितले, ह्या भारताची शासनाची चिन्हे कशी बौद्ध आहे हे ही सांगितले, आजच्या लेखाच्या ,माध्यमातून सांगण्याचे कारण असे कि, आपला भारत, नेपाळ, लंका, बर्मा, सुवर्णद्वीप, जावा, इंडोनेशिया, हिंद-चीन, अफघानिस्तान-मध्य आशिया, पश्चिम आशिया, तुर्फान, चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, इत्यादी ही सर्व आपली बौद्ध राष्ट्र आहेत. इथल्या मातीमध्ये लाखो, करोडो, अब्जो बौद्ध प्रतीके, बौद्ध रूपे, बौद्ध नगरी, बौद्ध लेण्या आहेत, आणि गर्वाची गोष्ट ही तथागातांची पद आपल्या भूमीला लागलेले, आपल्या भारत भूमीत आपल्याला जन्म मिळाला आहे. तर बंधुंनो, बौद्द्ध धर्मातील अत्यंत पूजनीय बुद्ध प्रतिक स्तुपा बद्दल आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. स्तुपाला पालीत खरा शब्द "थूप" हा आहे. चैत्यगृहात बुद्ध मूर्ती ऐवजी स्तूप कोरून त्याला वंदना केली जाते. परंतु चैत्यगृह आणि चैत्यसभा यांच्या माग ही गेले असता पावांच्या मल्यांनी वैशालीच्या लिच्छविनी बुद्ध आणि संघासाठी जे संघराम बांधले ते त्यांच्या गणसभेतील प्रतिकृती होती.


 महाराष्ट्रातील लेण्या कोरलेले भरीव पाषाण स्तूप हे पूर्वीच्या अनेक विटांच्या स्तुपांची प्रतिकृती आहे. तसेच काही स्तूप ओतीव धातूचे आहेत. स्तुप हे बौद्ध प्रतिक जरी असले तरी स्थलकालपरत्वे शिल्पिंनी त्यांना दिलेल्या निर्देशांनुसार वा त्यांनी आपल्या प्रतिभेचा वापर करून त्यात अनेक बदल वेळोवेळी केले, म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप निरनिराळ्या लेण्यांवर बौद्ध पुरातत्वीय संग्राहलयात आढळून येतात.


 स्तूप पूज्य व्यक्तींच्या अवशेषांवर देखील उभारले आहे. काही ठिकाणी स्पुतांचा उल्लेख डागोबा, धातुगर्भ असा ही होतो. स्तुपांच्या ढिगाऱ्याला अंड म्हणतात. ज्या पात्रात अवशेष असतात त्याला दागोबा म्हणतात.


 हीनयान पंथांयांनी उभारलेले स्तूप ओबडधोबड व साधे असून महायान पंथीयांनी चैत्यगृहातील स्तुपला शिल्पांनी अलंकृत करण्याचा आणि दर्शनीय भागावर बुद्धाची मूर्ती कोरण्याचा प्रघात पाडला. काही स्तुपांवर हर्मिका असतात, त्यावर एकावर एक अशी तीन, पाच, सात छत्रे उभारलेली मिळतात. महायान पंथांनी बुद्धांच्या मूर्तीची पूजा सुरु करण्यापूर्वी साधक लोक स्तुपांची पूजा करत असत. स्तुपांभोवती प्रदक्षिणा घालता यावी यासाठी नंतर प्रदक्षिणा पद बांधण्याचा प्रघात सुरु झाला. स्तुपाचा अर्थ आपण पाहिला असता, स्तवन करणे म्हणजे प्रशंसा करणे, तसेच स्तूप म्हणजे जोडणे किंवा एकत्र करणे असा ही होतो. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्र विचार केल्यास लोकांची श्रद्धा असणारे स्मारक उभारणे असा ही त्याचा एकंदरीत अर्थ होतो. भगवान बुद्धांवर असणारी लोकांची श्रद्धा व त्यानंतर श्रेद्धेय व्यक्तींच्या शारीरिक धातूंवर स्तुपांचे स्मारक उभारण्याची सुरुवात झाली. महाकारुनी गौतम बुद्धांच्या शारीरिक धातुंवरती स्तूप उभारण्यात आले. 


दीर्घ निकाय मध्ये स्तुपांचे विस्कृत पणे नोंदी आपणास पाहायला मिळतात. मौर्यकाळत जरी स्तुपांच्या बांधणीस सुरुवात झाली असली तरी सातवाहनाच्या काळात मात्र त्यावर कळस चढविण्यात आला. लेण्यांमध्ये स्तुपांची रचना आखीव व रेखीव त्याच काळात करण्यात आली. स्तुपांचे सुरुवातीचे स्वरूप माती, विटा, आणि दगड यांनी बांधलेला ढिगारा असे होते. या स्तुपामध्ये महान पुरुषांचे शारीरिक धातू ठेवून या स्तुपांची पूजा केली जात असे. या ढिगाऱ्याला अँड असे म्हणतात. ढिगाऱ्याच्या माथ्यावर एक चौकोन कट्टा ठेवला जात असे त्याला हर्मिका असे म्हणतात. त्यावर एक यष्टी व छात्रवली असते. ढिगाऱ्याच्या भोवती एक वेदिकापट्टी असते. स्तुपांची पूजा करण्यासाठी स्तुपांच्या बाजूला प्रदक्षिणा पद असते. त्याला उंच कठडा करण्यात आलेला असतो. कठड्याला चारही बाजूने दरवाजा असते, त्यास प्रवेशद्वार म्हटले जाते. अशी प्राथमिक स्वरूपात स्तुपांची रचना होती.


 संयुक्त रित्या स्तुपांचा अभ्यास केला असता, स्तुपांचे तीन प्रकार दिसून येतात. १) शारीरिक धातूवर बांधलेले स्तूप, “शारीरिक स्तूप” २) बौद्ध प्रार्थना स्थळी बांधलेले स्तूप तसेच विशिष्ट उद्देशासाठी बांधलेले स्तूप “उद्देशिका स्तूप” ३) श्रेष्ट भिक्षूंच्या प्राचीनीतील अवशेषांवर बांधलेले स्तूप म्हणजेच पारी भोवती स्तूप, देशभरात बौद्ध स्तूप वास्तू रचनेमागे गर्भित अर्थ बौद्ध विचार सारनीतून पाहिले असता, ज्यावर स्तूप वास्तू उभारली गेली ते जोते किंवा चौथरा म्हणजे भूलोक. त्यावरील अर्धवर्तुळाकार बांधकाम याला अंड असे संबोधतात. त्याचा घुमटीवजा अर्धगोलाकार आकार म्हणजे आकाशाचे प्रतिक. त्यावरील चौकोनी चौकोनी भाग हर्मिका म्हणजे देवलोक. यष्टी म्हणजे विश्वाचे रूप दर्शन यष्टीवर ज्या छत्र्या दर्शविल्या जातात त्या छ्त्रावल्या म्हणजे भव्यतेच्या स्तूप वास्तूंशी सुसंगत असा ध्वजस्तंभ प्रांगण असे समजले जाते. 


बंधुंनो, अभ्यासासाठी आपण ठाणाले लेणी येथे आपल्याला दोन स्तूप पाहायला मिळतात, तसेच तुळजा लेणी जुन्नर येथे स्तुपांच्या भोवती १२ अष्टकोणी खांब कोरलेले दिसतात. कान्हेरी लेणी येथे कार्ले लेणी येथे, कोंढाणा लेणी येथे, अजिंठा लेणी येथे, तसेच जेथे जेथे चैत्यगृह आहे त्या चैत्यगृहामध्ये स्तूप कोरलेले आहेत. 


बंधूंनो भाजे बौद्ध स्तूप येथे शैलगृहातील ५ व्या दागोबाच्या तळाशी शिलालेख असून सदरचा शिलालेख धम्मलिपी मध्ये आहे. त्याचे मराठी भाषांतर “आदरणीय स्थविर संघ दिनाचा स्तूप” असे असून, नमूद केलेले आहे. तसेच भाजे येथे शैलगृहातील ३ रया, दागोबाच्या तळाशी धम्मलिपीमध्ये शिलालेख असून त्याचे मराठी भाषांतर “आदरणीय स्थविर अपिंकिणक याचा स्तूप” असे नमूद केलेले आहे. तसेच भाजे शैलगृहातील मोठ्या दागोबाच्या घुमटावर धम्मलिपीमध्ये शिलालेख लिहिलेला असून त्याचे मराठी भाषांतर “आदरणीय स्थविर धमगिरी यांचा स्तूप” असे नमूद केलेले आहे. तसेच भाजे शैलगृहातील शिलाखंडा खालील येणाऱ्या दुसऱ्या ओळीत एका दागोबाचे शीर्षावर शिलालेख असून हा लेख अपूर्ण आहे. लेख धम्मलिपीमध्ये असून त्याचे मराठी भाषांतर “तेरानं भयंत” असे नमूद केलेले आहे. तसेच भाजे शैलगृहातील मोठ्या दागोबाच्या घुमटावर शिलालेख सापडला असून त्यामध्ये देणगीची नोंद केली आहे.


बंधुंनो, कान्हेरी लेणीमध्ये निर्वाण भूमी असून तेथे शारीरिक धातुंवरती विटांचे स्तूप मिळून आले आहे. डॉ. जेम्स बर्डस यांना १८३९ मध्ये कान्हेरीच्या मुख्य चैत्यगृहासमोर असलेल्या विटांच्या स्तूपात दोन त्रेकुटककालीन ताम्रपट सापडले. कान्हेरी येथे दुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यात खुल्या स्वरूपाचे विहार असून अंतर्भागात दोन दालनात दोन स्तूप कोरलेले असून स्तुपांभोवती बुद्धांच्या अवकेश्वरांच्या प्रतिमा व त्या भोवती आकाशगामी यक्ष गंधर्व प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे स्तूप कान्हेरीतील मुख्य धर्म गुरूंच्या स्मरणार्थ बांधलेले आहे. कान्हेरी लेणीमध्ये ३८ क्रमांकाच्या लेणींच्या आसपास सहाशे फुट लांबीच्या दालनात विटांनी बांधलेले अनेक उध्वस्त स्तूप आहेत. तसेच कान्हेरीमध्ये निर्वाण भूमी येथे सोळा बाजू असलेल्या सर्वात मोठे स्तूपाचे अवशेष दिसून येतात. त्याची हर्मिका पडलेली दिसून येते. या सुपाच्या १८८३ साली या स्तूपाच्या पायाच्या उतखन्ननास स्तुपांच्या अवशेषासोबत सिंह, वाघ, हरीण व कीर्तिमुख यांची शिल्पे तसेच योग मुद्रा आणि धम्म प्रवचन मुद्रेतील बुद्धाच्या मूर्तीतील शल्पपट मिळाला होता. या शल्पपटात बुद्धाच्या शेजारी चीवरधारी व्यक्ती १९७३ साली **डॉ. शोभना गोखले, यांना निर्वाण भूमीच्या शेजारी असलेल्या दरीत बौद्ध भिक्षूंची नावे असलेले २७ शिलालेख कोरलेले दगड सापडले.** या शिलालेखांवर अक्षर पद्धतीत वाकाटककालीन आहेत. विटांच्या स्तुपांवरील ह्या नावाचे दगड हे नंतरच्या काळात स्तूप उध्वस्त झाल्याने दरीत पडले असावे, या शिलालेखावरून कान्हेरी येथे असलेले स्तूप भिक्षूंच्या स्मरणार्थ बांधले होते हे समजण्यास मदत होते. तसेच **सन १८३९ साली डॉ. जेम्स बर्डस यांनी कान्हेरीच्या मुख्य चैत्यगृहासमोर असलेल्या विटांच्या स्तुपांचे दोन ताम्रपट सापडले, त्या संबंधीचे ते लिहितात कि, “पाहणी करण्याकरिता १२ ते १६ फुट उंच स्तूप निवडला तो घडीव दगडाचा असून त्याची बरीच पडझड झाली होती, वरून खाली जमिनीपर्यंत खोदल्यानंतर आणि दगड माती बाजूला काढल्यानंतर कामगारांना एक गोलाकार दगड सापडला, तो मध्ये पोकळ असून वर शिशाच्या तुकड्याने झाकला होता, त्या दगडात तांब्याचे दोन लहान कलश होते, एका कलशात थोडी रक्षा, एक रुबी (लाल), एक मोठे सोन्याचे लहान तुकडे आणि सोन्याची लहान पेटी होती, त्या पेटीत वस्त्राचा एक तुकडा होता. दुसऱ्या कलशात चांदीची पेटी आणि थोडी रक्षा होती, त्या कलशाच्या जवळ दोन ताम्रपट होते, हा ताम्रपट त्र्यैकुटककाळ २४५ (सन ४९४/४९५) काळातील आहेत. या ताम्रपटा नुसार सिंधू देशातील कनकचा रहिवाशी बुद्धीश्री व पुष्पवर्मान याचा मुलगा भिक्षु बुद्धीरुची याने विटाच्या स्तुपांची निर्मिती केली. वरील ताम्रपटात दगड आणि वीट या पासून निर्माण केलेल्या स्तुपाला चैत्य अशी संज्ञा वापरली आहे**. बंधुंनो, मला माहिती आहे हा लेख खूप मोठा झाला आहे, आणि अभ्यासाकरिता जास्तीत जास्त लेणीच्या स्तुपांचे संदर्भ देता आलेले नाही, त्यासाठी भारतीय पुरातन खात्याने तसेच संशोधकांनी जास्तीत जास्त लेण्यांमधील उतखन्ननाची माहिती प्रकाशित करावी आपण देखील आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सापडलेल्या लेण्यांमधील उतखन्ननाची माहिती संग्रही करावी व आपला गौरवशाली इतिहासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी तर **बंधुनो, नेहमी प्रमाणे आपण एक संकल्प करूया आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सर्व उतखन्ननाची माहिती आपण मिळवूया, घेऊया आणि आपला गौरवशाली इतिहास त्यामध्ये शोधून जनमानसांमध्ये पसरवूया**, तर बंधुंनो, पुढील लेख लेणींमधील शिलालेख यावरती आपण सविस्तर अशी माहिती आपण पाहणार आहोत. हा लेख तूर्तास क्रमश चालू ठेवून मी इथेच थांबतो. 


**क्रमश**

**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,*

**दि ग्रेट अशोका आर्मी*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



**लेख आठवा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?**

बंधुंनो, मागील लेखात आपण लेण्यांमधील स्तुपांबद्दल थोडक्यात माहिती पाहिली आहे. मोजक्या उदाहरणार्थ आपण लेण्यांमधील स्तुपांचा अभ्यास केला. प्रत्येक लेणीमध्ये चैत्यगृहात स्तूप असतो, हे पाहून शारीरिक स्तूप, उद्देशिका स्तूप, आणि बौद्ध विचार सारणीच्या पारीभोवती स्तूप कशाला म्हणतात हे पाहिले, तसेच भाजे येथील स्तुपांचे कान्हेरी येथील निर्वाण भूमीतील स्तुपांची माहिती पाहिली, कान्हेरी येथील झालेल्या सन १८३९ सालीच्या डॉ. जेम्स बर्ड्स यांनी केलेल्या उतखन्नाची माहिती पाहिली, आणि नेहमी प्रमाणे संकल्प केला कि, **आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात झालेल्या उतखन्नाची माहिती मिळवून त्यामध्ये आपला गौरवशाली इतिहास शोधून तो इतिहास जनमाणसात पसरवू**, तर बंधुंनो, याचा क्रमश पाठ लेख आठवा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. याचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला हातभार लावावा ही विनंती.


**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**


**लेख आठवा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?**


बंधुंनो, लेख सुरु करण्यापूर्वी **फेसबुक पेज “मंदिर, लेणी, शिल्प, वास्तू”, “रानवाटा”, “बुद्ध आणि त्याचा धम्म”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा धम्म”, “आंबेडकरी चळवळ व्हॉईस ऑफ पिपल”, “इतिहास अभ्यासक मंडळ”, “दीक्षाभूमी”, बुद्धिस्ट फ्रेंड्स, इत्यादी फेसबुक पेजचे निर्माते आणि अॅडमीन आणि सर्व फेसबुकच्या माध्यमातून वाचणारे मित्र यांचे मी लेणी संवर्धन समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. तुम्ही दिलेल्या सहयोगामुळे ही लेख मालिका मोठ्या प्रमाणात वाचक मित्रांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. संस्था आणि मी स्वतः वि. वा. येलवे, आपला सदैव ऋणी आहे, सर्व वाचक मित्रांणा विनंती आहे कि, त्यांनी या लेख मालिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करावा आपल्या व्हॅटसप ग्रुप मधून फेसबुकच्या माध्यमातून आपल्या मित्र, परिवारामध्ये हे लेख प्रसारित करावे आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या.** मागच्या लेखामध्ये आपण केलेले संकल्प आठवावे आणि ते पूर्ण करण्यासठी पुढे यावे, 


तर बंधुंनो, आता या मालिकेतील आठवा लेख सादर करताना मला आवर्जून सांगावेशे वाटते, दगडावर अथवा शिलेवर कोरून ठेवलेला लिखित मजकूर अनंत काळासाठी टिकून राहावा या उद्देशाने आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या लेण्यांमध्ये, स्तुपांमध्ये, स्तंभांवर, त्या वास्तूच्या निर्मितीसाठी दान देणाऱ्यांचे, वास्तूच्या उद्देशाचे राजकीय, धार्मिक, समाजिक आणि ऐतिहासिक माहिती शिलालेखांच्या माध्यमातून लिहून ठेवली. त्यातील शिलालेखांची भाषा प्राकृत, पाली असून आपल्या लेण्यांमध्ये धम्मलिपी, (ब्राम्ही), खरोस्टी, संस्कृत आणि परदेशी भाषांमध्ये अनेक शिलालेख सापडले आहेत. शिलालेखांमध्ये असलेल्या व्यक्तींच्या नावावर आणि अक्षरांच्या वळणावरून शिलालेखांचा काळ ठरविता येतो. कोणत्याही देशाच्या संस्कृतीमध्ये शिल्पे, शिलालेख त्या देशात असलेली बौद्ध मंदिरे, लेण्या, किल्ले यांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रामुख्याने भारताचा विचार केला असता, अशोक काळापासून आता पर्यंत सर्व धर्माच्या सर्व संप्रदायाच्या पंथांच्या लोकांनी आपआपल्या धार्मिक वास्तूंची निर्मिती केली आहे. त्यासाठी शिल्पकलेचे अनेक प्रकार त्यांनी हाताळले, प्रामुख्याने सांगावेशे वाटते कि, आपल्या समाजातील (बौद्धांनी) लोकांनी स्तूप, लेणी ह्या प्रकारची निर्मिती केली. लेणींच्या पार्श्वभूमी उलघडून सांगण्याकरिता लेण्यांमध्ये कोरलेले शिल्प आणि शिलालेख हे महत्वाची भूमिका बजावतात. लेणी साकारण्यासाठी सर्व सामान्य गरीब माणसापासून धनाठ्य व्यक्ती पासून व्यापारी, राजे, महाराजे, सम्राटांपर्यंत सर्वांनी उद्धट भावनांनी आपला श्रमदान कसा दिला आहे हे शिलालेखांच्या वाचनातून अभ्यासता येते. त्यातूनच लेण्यांबद्दल असलेली श्रद्धा, त्याग याचे दर्शन घडते.


 बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रात ८०० हून अधिक सर्वाधिक लेण्या आहेत. त्यामध्ये महाराष्टातील सामाजिक, धार्मिक, व राजकीय क्षेत्रात घडलेल्या तत्कालीन परिस्थितीतील अनेक घटनांवर प्रकाश टाकण्यासाठी अभ्यासकांना, संशोधकांना शिलालेखातील माहितीचा उपयोग करता येतो. सह्याद्री महाराष्ट्राचा मानबिंदू ह्या सह्याद्रीच्या कडेटोकावर इतिहासाची पाऊलखुणा सुमारे २००० हजार वर्षापासून महाष्ट्रातील कारागिरांनी केवळ छिन्नी आणि हातोड्यांचे घाव घालून अनेक लेण्या निर्माण केल्या, महाराष्ट्रात बहुतांश पांडव लेणी म्हणून ओळखली जाणारी आणि काहीशी पडकी भासणारी लेणी निरखून अभ्यासून वाचली असता, त्यामध्ये सापडलेले शिलालेखांवरून, दानलेखांवरून, लेणीतील शिल्पांवरून मुर्त्यांवरून, ती लेणी बुद्ध लेणी आहे हे सांगायची वेगळी गरज नाही. बंधुंनो, त्याकरिता लेण्यांमध्ये असलेले शिलालेख आपल्याला वाचता येणे गरजेचे आहे. अधिक सखोल न जाता माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक, युट्युब वेबसाईट, ब्लॉगच्या माध्यमातून लेण्यांमध्ये असलेले शिलालेख आपल्या बऱ्याच धम्मबांधव युट्युबर्सनी ब्लॉगर्सनी वाचून दाखविले आहे. यथा तुम्हाला जर ते शिलालेख वाचायचे असल्यास तुम्हाला अशोक कालीन धम्मलिपी, चंद्रगुप्त कालीन धम्मलिपी, सिंद्दामलिपी, खोरस्टीलिपी, शारदालिपी, नागरीलिपी, देवनागिरी लिपी यांचा अभ्यास हवाय. लेण्यांमध्ये धम्मलिपी (ब्राह्मी), आणि खोरस्टीलिपी मध्ये जास्तीत जास्त शिलालेख लिहिलेले असून तुम्ही दहा दिवस ते एक महिना धम्मलिपी (ब्राह्मी) खोरस्टीलिपीचा अभ्यास केला असता, तुम्ही या लिपीची मुळाक्षरे बाराखडी आणि छोटी छोटी वाक्य जोड शब्द वाचू शकता. त्याकरिता युट्युबच्या माध्यमातून धम्मलिपी शिकण्याचे अनेक युट्युब वर विडीयो असून घर बसल्या विडीयोच्या माध्यमातून ह्या लिपीचे ज्ञान तुम्ही घेऊ शकता. तसेच लिपींची पुस्तके उपलब्ध असून त्या पुस्तकांच्या मार्फत तुम्ही धम्मलिपी शिकू शकता. 


बंधुंनो, प्राचीन लेणीमधील शिलालेख स्वतः वाचणे हा एक वेगळाच आनंद आहे. तुम्ही कोणत्याही लेणीवरती अभ्यासाकरिता गेलात तर लेणीवरती स्तूप, चैत्यगृह, विहार, वरांडे, स्तंभ, पानपोढि येथे शिलालेख तुम्हाला कोरलेले दिसून येतील, लेणीचा विचार करताना लेणी एकसंध पाषाणात कोरली जाते. अजिंठा आणि जुन्नर येथील काही अर्धवट कोरलेल्या चैत्यगृहांच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे. लेणी कातळाच्या वरच्या बाजूने कोरायला सुरुवात केली जात असे. कारागीर केवळ छिन्नी हातोड्याच्या मदतीने लेणी कोरत असत. कातळावर स्थपतीने आखलेल्या रेखांकनप्रमाणे खांब आणि तुल्याची जागासोडून कारागीर इतर भाग कोरत. खालच्या भागाकडे त्यानंतर शिल्पकार त्या खांबांना सुबक आकार देऊन त्यावर नक्षीकाम कोरत असत. त्यानंतर लेणीत लेणी दान देणाऱ्यांच्या दानपरीमितीचे शिलालेख लिहिला जात असे, बंधुंनो, काहिक ठिकाणी शिलालेख काळ्याच्या ओघाने बुजले गेलेले आहेत. तसेच लेण्या परिवर्तीत करताना म्हणजेच त्यावर आक्रमण करून दुसऱ्या धर्मात रुपांतरीत करताना ते शिलालेख जाणूनबुजून मिटविले गेलेत, व त्यावर दुसरे शिलालेख बदलत्या परिस्थिती प्रमाणे लिहिले गेले. महाराष्ट्रात लेणी आणि बौद्ध मंदिरे, पाणवठे येथे असंख्य शिलालेख असून भारतीय व परदेशीय संशोधक या शिलालेखांचे संशोधन करीत आहेत. 


बंधुंनो, महाराष्ट्रात लेणींचा अभ्यास करणारे अभ्यासक तुलनेने कमी असून त्यांनी केलेला अभ्यास जास्तीत जास्त संशोधन वर्तुळातील संशोधन इंग्रजी पत्रिकांमध्ये प्रसिद्ध होते. त्यामुळे सर्व सामान्य वाचकांपर्यंत पोहोचविला जात नाही. अजिंठा, वेरूळ, कुडा, महाड, पन्हाळेकाजी, कार्ले भाजे, बेडसे, जुन्नर नाशिक, अंकाई, टंकाई, पितळ खोरा, औरंगाबाद, दुर्गेश्वरी, असंख्य शिलालेख सापडले आहेत. 


बंधूंनो अभ्यासाकरता अजिंठा येथे लेणी क्र. १६ वरह देवाचा लेख लेणी क्र. १७ हरिषेणाच्या मंडलीकेचा लेख, लेणी क्र. २० उपेंद्रगुप्ता यांचा लेख सापडले आहेत. 

  

बंधूंनो, पुणे येथील शिवनेरी किल्यावरती असलेल्या २००० हजार वर्षापूर्वीच्या बौद्ध लेण्यांमध्ये लेणी क्र. ३ ते ५ या एकाला एक लागून असलेल्या चौरस खोल्या असून त्याच्या उजव्या बाजूस पाण्याची टाकी आहे. तेथे लेणी क्र. ४ मधील शिलालेख असून भूतेनक नावाच्या व्यक्तीने हे पाण्याची टाकी व लेणे दान दिल्याचे म्हटले आहे. लेणी क्र. ६ ते १५ शिवनेरी किल्यावर सामान्य एक खोलीवजा विहार, लेणी असून त्यास बाहेर ओसरी आहे. लेणी क्र. १६ व १७ ही दोन मजली लेणी असून खालच्या मजल्यास छोटेसे आंगण आहे. मधल्या रुंद दरवाज्याच्या दोन्ही बाजूस खिडक्या असून आत चौरस मंडप व मागील भिंतीत सात खोल्या आहेत. उजवीकडून कोपऱ्यात वरच्या मजल्यावर जाण्याकरिता जिना आहे. या लेण्यात शिलालेख सापडला असून या शिलालेखा नुसार उपस्थानासाठी “मुधकिय मल” (मुर्धकीय मल्ल) “गोलीकीय (गवळी) आनंद यांनी दान दिल्याचे नमूद केले आहे. लेणी क्र. २७ हे बरेच मोठे लेणे असून त्यामध्ये खंडित शिलालेख असून फक्त यवन हा शब्द वाचता येतो, लेणी क्र. ३५ व ३६ ही लहान परंतु शिलालेखामुळे अत्यंत महत्व प्राप्त झालेली लेणी आहे. त्यास लागून एका ओळीत ३७ ते ४० या एका एक खोलीवजा लेणी आहे. लेणी क्र. ३६ ला एक छोटी ओसरी असून डाव्या बाजूस उठावदार स्तूप कोरलेला आहे. ओसरीतील दरवाज्याच्या डाव्या बाजूस भिंतीवर ५ ओळीत खंडित लेख आहे या नुसार अपगुरिय सवगीरीय याचा पुत्र पतिबधक गिरिभूती याने हे लेणे व बाजूचे टाके दान दिले आहे असा उल्लेख आहे. लेखात जुन्नर नगरीतील भिक्षुणी संघाचा उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे. तसेच त्या लेखात धर्मोतरीय संघाचा उल्लेख असून भिक्षुणी संघाची मुख्य ही एक स्त्री होती, व तिच्या नावावरून सिवपालितनिका (सिवपालितनिका) तो संघ ओळखला जात असे. लेणी क्र. ४८ हे एक चैत्त्यगृह असून आतमध्ये एक स्तूप असून या लेण्यात शिलालेख सापडला आहे. गृहपतीप्रमुख व्यापारी असणाऱ्या वीरसेन यांनी या चैत्यगृहासाठी दान दिले ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी व सुखासाठी अर्पण केले आहे असा उल्लेख आहे. लेणी क्र. ४९ ते ५३ लेणे असून तेथील पाण्याच्या दोन टाक्यावर दोन शिलालेख सापडले आहे, त्यातील पहिल्या शिलालेखा नुसार “गता” देशाचा यवन इरील याने पाण्याची दोन टाकी दान दिली तर दुसऱ्या टाकीवरील लेखानुसार उपगुरिय सवगीरीय याचा पुत्र पतिबधक गिरिभूती व त्याची पत्नी शिवपालनिका यांनी लेणे व टाक्यास कायम निधी दिले असल्याचे म्हटले आहे. लेणी क्र. ५५ येथे सापडलेल्या लेखनुसार उपासक उगाहचा पुत्र इसिपालीत व त्याच्या मुलांनी दान कर्म केले असा उल्लेख आहे. लेणी क्र. ५७ येथे बाहेर उजवीकडील प्रशस्त पाण्याची टाकी असून त्यावरील लेखात गतादेशाचा यावतचित याने संघास हा भोजन मंडप दिल्याचे म्हटले आहे. लेणी क्र. ५९ हे जोड लेणे असून भिंती पासून अलग स्तूप अखंड दगडात कोरलेला आहे. तेथे असलेल्या लेखातून उगाहाचा पुत्र इसिपालीत आणि त्याच्या कुटुंबीयांनी हे चैत्यगृह दान दिल्याचे समजते. तसेच बंधुंनो, महत्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्याच्या पूर्व, दक्षिण, आणि पश्चिमेकडील खोदलेले महत्वाचे बौद्ध (थेरवाद) लेणी समूहात पूर्ण अपूर्ण मिळून ८४ लेणी ६० पोढी ९ धम्मलिपीतील शिलालेख (ब्राह्मी) आहेत. तर बंधुंनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्यावरती एवढा मोठा शिलालेखांचा साठा आहे तर आपण आपल्या गड किल्यांवरती प्रामाणिक पणे अजून शोध घेतला तर कितीतरी आणखीन बौद्ध लेणी समूह शिलालेख प्रकाशात येतील. 


बंधुंनो, अभ्यासाकरिता प्रामुख्याने मुंबई, बोरीवली, येथे असलेली कान्हेरी लेणी पाहिली असता येथे मोठ्या प्रमाणात शिलालेख सापडले आहेत कान्हेरी लेणी येथे ५१ शिलालेख आणि २६ वचननामे संशोधनास सापडलेली आहेत. ९० व्या क्रमांकाच्या गुंफेमध्ये वचननामेत सातवाहन राजा वाशिष्टपुत्र याचा रुद्रदवर्णची कन्या सतकरणी हिच्याशी विवाह झाल्याचा संदर्भ आहेत. अजून नवीन नवीन शिलालेख सापडत आहेत. कान्हेरी गुंफेतील शिलालेख धम्मलिपी, देवनागिरी, पहलवी लिप्यांमध्ये सापडले आहेत. येथील चैत्यगृहाच्या पुढेच लेणी ५ च्या पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूला सातवाहनाच्या अतिशय महत्वाचा काहीसा खंडित शिलालेख प्राचीन धम्मलिपीत कोरलेले असून त्याचा लिपियंत “......वासिष्ठीपुत्रस्य श्रीसात[कर्णी]स्य देव्या: कार्दमक-राजवंशप्र[भ]वाया महाक्षत्र[प्र] रुद्र...पुत्र्या:...... ........[स्या]....[वि]श्र्वस्यस्य अमात्यस्य शतेरकस्य पानीयभोजनं देयधर्म्म:” याचा मराठी भाषेत अर्थ “......वासिष्ठीपुत्र श्रीसातकर्णीची राणी.... जी कार्दमक राजवंशात जन्मली आहे आणि महाक्षत्रप रुद्र [रुद्रदामन] याची कन्या आहे तिच्या शतेरक नामक विश्वासू अमात्याचा हे पाण्याने धर्मादाय आहे”. इथेच लेणी क्र. ३६ च्या वरांद्याच्या भित्नीवर ७ ओळीचा एक शिलालेख कोरलेला आहे. त्याचा लीपियंत “सिंध [ | ] राञो माडरिपुतस स्वामिसक्सेनस सवछरे ८ गि प ५ दिवसे दिव १० एताय पुवाय क – लियणकस नेकमस वेण्हूनंदिस पुतस नेग – मस गहपतिस ...तिस लेण पतिठापी – त सहा आय्य्केन.. सेन सहा पितुणा वेण्हून – दिना सहा मातुय बोधिसमाय सहा भा – [तुना..]हथीना सहा [स] वेन [निकाययेनेति] [ |*]”, याचा मराठी भाषेत अर्थ “सिद्धी असो. राजा माढरीपुत्र स्वामी शकसेनाच्या राज्यकालाच्या संवस्तर ८, ग्रीष्म पक्ष ५, दिवस १० या पूर्वोक्त तिथीस कल्याणचा रहिवासी आणि व्यापारी विष्णूनंदी याचा पुत्र, व्यापारी आणि गृहपती..... याने हे लेणे कोराविले. त्याच्याबरोबर आर्यक(पूज्य)... त्याचा पिता विष्णूनंदी, त्याची माता बोधिसमा, याचा भाऊ हस्ती आणि सर्व व्यापारी वर्ग सहभागी आहेत”. असा आहे.लेणी क्र. ३ च्या चैत्यगृहाच्या समोर आतील स्तंभावर दोन्ही बाजूला शिलालेख कोरलेले असून त्यांचे लिपियंत 

राञो गोतमि [ पुतस सामिसियञ ]

सातकणिस [ संवछरे .......गि- ] 

म्हपखे पंचमे [ ५ दिवसे ....... ]

वाणिकजेहि उतू ..........

णुं उपंनेहि गा ..........

खातियेहि भातूहि...............

गजसेनेन गजमि [ तेन ]..........

कपठायि चेतिय..........

आचरियानं निकायस.... भदाय

नियानं परिगहे पतिठापितं......मा-

तापितुनं अभतीतानं.....

पूजाय कुडूबिनीन बालकानं बालि [ कानं ]

सवतस भागिनेयान निकायस नाति-

वगस च अग पटीअसिय सव्वस् [ तानं ] हिसुखाय हेतू | एथ च नव [ कमि ] 

का पवजितो थेरा भदत बोधिको

भदत धमपाला उपासको च नेगमो अनद-

युतो उपरेनुको स्मापिता | आचरियान थेराणं 

भदत सेउंलानं सिसेन उपर्खितन भ-

दत बोधिकेन कत सेलवढकिही [ नाय ]कमि-

सेहि कढिचकेहि महाकटकेहि खदर-

किना च मीठिकेना | याचा मराठी भाषेत अर्थ “राजा गौतमीपुत्रस्वामी श्री यज्ञ सातकर्णीच्या संवत्सर ग्रीष्म ऋतूच्या पाचव्या पक्षातील .. णु चे पुत्र खातिय, भाऊ गजसेन आणि गजमित्र यांनी हे कल्पांतापर्यंत टिकणारे चैत्य भदायनीय आचाऱ्यांच्या संघाचे म्हणून, आपल्या निधन पावलेल्या मातापित्यांच्या सन्मानार्थ, तसेच आपली भार्या, पुत्र, कन्या, सावत्र बंधू, सर्व भाचे व ज्ञातिवर्ग यांच्या तसेच सर्व प्राण्यांच्या हितसुखार्थ स्थापन केले. यावर देखरेख ठेवणारे प्रव्रजित स्थविर भदंत अचल, भदंत धर्मपाल, उपासक व्यापारी आनंदाचा पुत्र अपरेणूक यांनी हे काम पूर्ण केले. या कामावरील अधीक्षक आचार्य स्थविर शैवल यांचा शिष्य भदंत बोधिक याने लेणे खोदणारे पाथरवट(शैलवर्धक), कारागीर आणि उजाळा देणारे स्कंदरकि याच्या साहाय्याने हे काम पूर्ण केले”. तर बंधुंनो, महाराष्ट्रातील गावागावात बौद्ध परंपरा होती, लेण्या, बुद्ध मंदिरे, विहारे, मोठ्या प्रमाणात दानपरीमितीने निर्माण केली गेली होती. बौद्ध धर्मातील असंख्य थेर आणि थेरी यांची विहारे होती. लेण्या होत्या, काळाच्या ओघात धार्मिक आक्रमणे यांनी मोठ्या प्रमाणात तोडल्या गेल्या, परिवर्तीत, रुपांतरीत केल्या गेल्या, त्याच दगडांपासून नवी निर्मिती देखील केली गेली. तर **बंधूंनो आपण संकल्प करूया, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या धार्मिक पुरातन मंदिराजवळ, लेणीजवळ, जावू तेव्ह आपण आपले डोळे चौकस ठेवून आपल्या धम्माच्या खानाखुणा, चिन्ह, शिल्प, लिपी, (धम्मलिपी), लेख दिसून येतो का याचे प्रमाणिकपणे निरीक्षण करु, असा कोणताही लेख दिसलाच ताबडतोब त्याचा आपल्या मोबईलच्या कॅमेऱ्याने फोटो काढु आपल्या जवळ असलेल्या लिपी तज्ञाकडे पाठवून त्या लिपीच्या लिखाणाच्या वळणाने तो कोणत्या काळातील आहे व काय लिहिलेले आहे याची खात्री करु. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये तसेच भारतीय पुरातन खाते येथे कळवून ताबडतोब त्याचा ठसा घेऊ त्याची नोंद करु**. बंधुंनो, हा लेख लिहायला गेल्यास माझा पूर्ण जन्म निघून जाईल परंतु सर्व लेण्यांमधील शिलालेख वाचून संपणार नाहीत एवढा मोठा विषय आहे. रोज नवीन नवीन शिलालेख सापडत आहेत. नव्याने बौद्ध धम्मातील गौरवशाली इतिहासच एक सुवर्णकाळ लोकांच्या समोर येत आहे. तर बंधुंनो. आपण देखील त्याचे साक्षीदार होऊया आपण संकल्प करूया आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात डोंगर दऱ्यात, रानावनात, पानावठ्याजवळ, गडकिल्यांमध्ये जावून असा कोणता शिलालेख सापडतोय का त्याचा शोध घेऊया आणि आपण आपला गौरवशाली इतिहास जनमाणसांमध्ये पसरवूया तर बंधुंनो, लिहीण्यासारख बरच काही अजून बाकी आहे तरी मी स्वताला थोडस सावरून घेतोय तूर्तास लेख खूप मोठा होत असल्याका**लेख नववा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?**

बधुंनो, मागच्या लेखात आपण बौध लेण्यांमधील शिलालेखान बद्दल थोडक्यात माहिती पाहिली, लेण्यांमधील शिलालेख आपल्या पूर्वजांनी लेण्यानंची निर्मिती केली, त्यावर कोरून ठेवले आहे. त्या शिलालेखांच्या आधारे आपल्याला त्या त्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थितील अनेक घटनांवर प्रकाश टाकता येतो, अभ्यासकांना संशोधकांना शिलालेखांच्या माहितीवरून अक्षरांच्या वळणावरून, लिपीवरून, काळ निश्चित करता येतो. बंधुंनो, **आपण अजिंठा येथील लेण्यांमध्ये शिलालेखांचे तसेच पुणे येथे शिवनेरी किल्यावर असलेल्या बौद्ध लेणीवर शिलालेखांचे आणि कान्हेरी लेणीवरील शिलालेखांचा अभ्यास केला**. तसेच बंधुंनो, मागच्या लेखात आपण **संकल्प केला होता, आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, डोंगर दऱ्यात, रानावनात, पानवठ्या जवळ, गड किल्यांवर जावून असा कोणता शिलालेख सापडतोय का त्याचा शोध घेणार आहोत. आपण आपला गौरवशाली इतिहास जनमाणसांमध्ये पसरवणार आहोत**. तर बंधुनो, याचा क्रमश पाठ लेख नववा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. याचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करून लेणी संवर्धनाच्या कामाला हातभार लावावा ही विनंती. 


**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक**,

**दि ग्रेट अशोका आर्मी**


**लेख नवना**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?**

    

बंधुंनो, आपल्याला सर्वानाच अशोक स्तंभ हे माहिती आहेत, बंधुंनो, आपल्या भारत देशात महान सम्राट अशोक यांनी ८६ हजार स्तंभ निर्माण करून उभारले, ते आपणास माहित आहे. या स्तंभांवर ४ सिंह आहेत, ते चारही सिंह चार दिशांना तोंड करून आहेत. त्या सिंहाच्या खाली हत्ती, घोडा, सिंह आणि बैल इत्यादी प्राण्यांचे चित्र कोरलेले आहेत, शिवाय स्तंभावर २४ आरे असलेले धम्मचक्र देखील पाहायला मिळते. या चक्राला अशोकचक्र, धम्मचक्र असे म्हणतात. सारनाथ, दिल्ली, अलाहबाद, सांची, पटना, वैशाली बिहार (बिहार) येथे आपल्याला अशोक स्तंभ पाहायला मिळतात. **आपल्याला लेण्यांमध्ये चैत्यगृह, विहारे, स्तूप हे जसे दिसून येतात तसेच लेण्यांमध्ये कान्हेरी आणि कार्ला येथील चैत्यगृहाच्या समोर स्तंभ देखील दिसतात**. बंधुंनो, स्तंभ म्हणजे एखाद्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून उभे केलेले स्मारक. बांधुंनो, १८१७-१८१८ साली झालेल्या भिमाकोरेगाव येथील युद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने लढणाऱ्या आपल्या समाजातील सैनिकांच्या शौर्य बद्दल इंग्रजांनी भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभ उभा केला. या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भेट दिली होती, आणि दरवर्षी १ जानेवारीला आपण देखील भेट देतो, हे सर्वांना न्यात आहेच बंधुनो, **वेरूळ येथील लेणी आणि स्तंभाचे २० रुपयाच्या नोटीवरील चित्र आपल्या सर्वांनाच न्यात आहेच** हे चित्र पाहिल्यावरती तुम्हाला लेणीच्या समोर स्तंभ असतो, हे सांगायची वेगळी अशी गरज नाही. तरी देखील लेणी अभ्यासाच्या दृष्टीकोनातून लेणी वाचना मध्ये लेणीमधील सिंहस्तंभ हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बंधुंनो, कार्ला येथील लेणीमध्ये चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात सम्राट अशोकाने असे स्तंभ उभे केले या मालिकेतील सारनाथच्या धरतीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फुट उंच असून त्याची बैठक वर्तुळाकार आणि १६ कोनांमध्ये घडविलेले आहे. त्या स्तंभाच्या अग्र भागी एक वर्तुळाकार कलश दिसून येतो त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर ४ सिहांची आकृती कोरलेली आहे. या सिंहस्तंभाचा करविता “महारठी अग्निमित्रणक” याच्या दातुत्वाचा शिलालेख कोरलेला दिसतो. **बंधुंनो, चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे आभ्यासकांना वाटते त्याची एक सुचना शिल्पकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. तेथे एक सिंह आणि चक्र असलेल्या खांबामध्ये स्तूप दिसत आहे.** बंधुंनो, तसेच या चैत्यगृहाचे साम्य असलेले मुंबई बोरीविली कान्हेरी येथील असलेल्या चैत्यगृहाच्या समोर देखील दोन स्तंभ कोरलेले आहेत. तसेच कान्हेरी येथील चैत्यगृहाच्या समोर असलेले दोन स्तंभ हे आपण प्रत्येक्ष डोळ्याने पाहू शकतो.     

बंधुंनो, लेण्यांमध्ये आपल्याला खांब आढळून येतात. मुख्यता करून प्रत्येक लेण्यांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एकच लेणे कोरले जात असे, नंतरच्या काळामध्ये भिक्षूंची संख्या वाढल्यामुळे अनेक सभागृहाला लागून अनेक मोठी मोठी विहारे खोदली जावू लागली, तेव्हा आधार देण्याकरिता लेणी खोदताना खांब कोरण्यात आले. सुरुवातीच्या काळातील खांब हे विहारांमध्ये चौकोनी, अष्टकोनी असून त्यावर कोणत्याही प्रकारची शिल्प कोरलेली नव्हती. महायानाच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेण्यांमध्ये विहारांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या खांबांवरती शिल्पे कोरली गेली चैत्यगृहामध्ये असलेल्या खांबांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिल्पे कोरलेली दिसतात. लेणीमधील, विहाराच्या चैत्यगृहांच्या आतमध्ये असलेले खांब तसेच चैत्यगृहाच्या दर्शनीय भागावरती असलेल्या खांब हे शिल्पे कोरलेले असले तरी बहुतेक लोक चैत्यगृहाच्या समोर स्तंभ कोरण्याचे प्रथा लेण्यामधून दिसून येते. बंधुंनो, खरे पाहता लेणी कोरणे ही त्या9 काळातील अत्यंत महत्वाची राजकीय, धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक घटना होती, एखाद्या राजकीय, सामाजिक, धार्मिक घटनेच्या स्मरणार्थ लेणी कोरण्यापूर्वी स्तंभ कोरून लेणी कोरण्या मागचा उद्देश जाहीर केला जात असेल असे वाटते. तसेच एखाद्या भिक्षूच्या महास्थिवीरांच्या पूजनीय व्यक्तीच्या स्मरणार्थ लेणी समोर स्तंभ किंवा स्तूप उभारण्याची प्रथा असल्याचे दिसून येते. बंधुंनो, लेणीमधील स्तंभ बहुदा दगडी एक पाषाणाने कोरलेले असतात. काहिक वेळेला या स्तंभांमध्ये एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीच्या अस्थी कलश ठेवलेले असल्याची शक्यता आहे. तसेच ऐतिहासिक राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक लेख लिहिलेला असल्याची शक्यता आहे.

बंधुनो, अभ्यासाकरिता कार्ले येथे आपल्यला एक सिंहस्तंभ पाहायला मिळतो, कार्ले लेणी सुरुवातीच्या लेण्यात महायान बुद्ध प्रतिमा आणि विहार पाहायला मिळतो कार्ले येथे तीन मजली विहार असून वर जायला खोदून काढलेल्या कातळाचा जिना आहे चैत्यगृहाच्या डाव्याबाजूला विशाल स्तंभ असून चैत्यगृहाच्या वरांड्यात चैत्यकमानी, सज्जे, मूर्ती दिसून येतात कार्ले हे भरतील सर्वात मोठे चैत्यगृह असून चैत्यगृहात स्तूप हर्मिका, लाकडी छत्र, व छतावरील अजूनही शाबूत असलेली लाकडी फासळ्या दिसून येतात. चैत्यगृहात असलेली कोरीव स्तंभ व त्यावर कोरलेली शिल्पे छतांवर फासळ्यांसह बाहेरील सिंहस्तंभांची प्रतिकृती मध्यभागी स्तूप, उजवीकडे सिंहस्तंभ डावीकडे चक्रस्तंभ आणि दातुत्वाचे शिलालेख असून त्यापैकी वेजायंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जम्बुद्विपम्ही उतमम्’ वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्विपात उत्कृष्ट आहे. जम्बूद्वीप म्हणजे आपला भारत देश! वैजयंती गावाचा हा भूतपाल सांगतो, कि हे लेणे’ जम्बुद्विपात उत्तम’ म्हणजेच या साऱ्या भारतवर्षात अपूर्व असे आहे. आज दोन हजार वर्षे उलटली पण त्याचा हा गौरव आजही खरा ठरतो. तसेच कार्ला बौद्ध सिंहस्तंभ यावरती असलेल्या लेखानुसार गौतमी पुत्र महारथी अग्निमित्रणक याची सिंह स्तंभाची देणगी हा लेख वाचता येतो. 

तसेच बंधुंनो, हे आपण पाहिलेच वेरूळ येथे आणि विशाल स्तंभ पाहायला मिळतो, तसेच कान्हेरी येथे दोन स्तंभ पाहायला मिळतात, मागील लेखात त्यावर मिळून आलेले शिलालेख आपण पाहिलेले आहे माहितीसाठी पुन्हा देत आहोत. लेणी क्र. ३ च्या चैत्यगृहाच्या समोर आतील स्तंभावर दोन्ही बाजूला शिलालेख कोरलेले असून त्यांचे लिपियंत 

राञो गोतमि [ पुतस सामिसियञ ]

सातकणिस [ संवछरे .......गि- ] 

म्हपखे पंचमे [ ५ दिवसे ....... ]

वाणिकजेहि उतू ..........

णुं उपंनेहि गा ..........

खातियेहि भातूहि...............

गजसेनेन गजमि [ तेन ]..........

कपठायि चेतिय..........

आचरियानं निकायस.... भदाय

नियानं परिगहे पतिठापितं......मा-

तापितुनं अभतीतानं.....

पूजाय कुडूबिनीन बालकानं बालि [ कानं ]

सवतस भागिनेयान निकायस नाति-

वगस च अग पटीअसिय सव्वस् [ तानं ] हिसुखाय हेतू | एथ च नव [ कमि ] 

का पवजितो थेरा भदत बोधिको

भदत धमपाला उपासको च नेगमो अनद-

युतो उपरेनुको स्मापिता | आचरियान थेराणं 

भदत सेउंलानं सिसेन उपर्खितन भ-

दत बोधिकेन कत सेलवढकिही [ नाय ]कमि-

सेहि कढिचकेहि महाकटकेहि खदर-

किना च मीठिकेना | याचा मराठी भाषेत अर्थ “राजा गौतमीपुत्रस्वामी श्री यज्ञ सातकर्णीच्या संवत्सर ग्रीष्म ऋतूच्या पाचव्या पक्षातील .. णु चे पुत्र खातिय, भाऊ गजसेन आणि गजमित्र यांनी हे कल्पांतापर्यंत टिकणारे चैत्य भदायनीय आचाऱ्यांच्या संघाचे म्हणून, आपल्या निधन पावलेल्या मातापित्यांच्या सन्मानार्थ, तसेच आपली भार्या, पुत्र, कन्या, सावत्र बंधू, सर्व भाचे व ज्ञातिवर्ग यांच्या तसेच सर्व प्राण्यांच्या हितसुखार्थ स्थापन केले. यावर देखरेख ठेवणारे प्रव्रजित स्थविर भदंत अचल, भदंत धर्मपाल, उपासक व्यापारी आनंदाचा पुत्र अपरेणूक यांनी हे काम पूर्ण केले. या कामावरील अधीक्षक आचार्य स्थविर शैवल यांचा शिष्य भदंत बोधिक याने लेणे खोदणारे पाथरवट(शैलवर्धक), कारागीर आणि उजाळा देणारे स्कंदरकि याच्या साहाय्याने हे काम पूर्ण केले”. 

बंधुंनो, आपल्या लेण्यांमधील काही चैत्यगृहाच्या समोर सिंहस्तंभ कोरलेले होते, काळाच्या ओघात ते नष्ट केले गेले किंवा नष्ट झाले. तसेच आपण आता पहिले असता फक्त कान्हेरी आणि कार्ले येथील स्तंभ बघायला भेटतात. तर बंधुंनो, आपण जेव्हा कोणतीही एखादी लेणी बघायला गेले असता, त्या लेणीच्या आजूबाजूला तसेच दरीमध्ये प्राचीन स्तंभ आवशेष अजून पडलेले आहेत. तसेच असे कित्येक अवशेषांचे अजून संशोधन झालेले नसून काळाच्या ओघात ते मातीच्या ढिगाऱ्या खाली पडून आहेत. या लेणी संवर्धनाच्या लेखांचे मुख्य उद्देशच आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात असलेल्या प्राचीन लेण्यांवरती पुन्हा पुन्हा जावून तिथला प्राथमिक अभ्यास करावा, आपल्या लेण्यांमध्ये राजकीय, समाजिक धार्मिक परिस्थिती लोकांच्या समोर आणावी हा आहे. बंधुनो, ह्या लेखाच्या माध्यमातून जास्त लिहित नाही, नेहमी प्रमाणे आपण संकल्प करूया आपल्या लेण्यांचा गौरवशाली इतिहास जनमाणसांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरवूया मी इथेच थांबून पुढील लेख पोढी या बद्दल असून आपण पोढीन बद्दल सविस्तर माहिती पुढील लेखात पाहणार आहोत बंधुंनो, हा लेख क्रमश चालू ठेवून मी इथेच थांबतो.


**क्रमश**


**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**रणाने इथेच थांबून पुढील लेख लेण्यांमधील स्तंभ या बद्दल आपण सविस्तर माहिती पुढील लेखात पाहणार आहोत एवढे सांगून बंधुंनो, हा लेख क्रमश चालू ठेवून मी इथेच थांबतो.


**क्रमश**

**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**

🌴🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




**लेख दहावा**

**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?,**

बंधुंनो, मागच्या लेखात आपण लेणीवरती असलेल्या सिंहस्तंभा वरील माहिती आपण पाहिली, सध्या फक्त कार्ले आणि कान्हेरी या लेण्यांच्या चैत्यगृहांच्या समोर सिंहस्तंभ आहे हे आपण पाहिले, बंधुंनो, या मालिकेतील नववा लेख आपण आपल्या लेण्यांचा गौरवशाली इतिहास जनमाणसात पसरवणार आहोत असा संकल्प करून थांबलो होतो. बंधुंनो, या लेणी संवर्धन व्याख्यान मालिकात मला तुम्हाला सांगताना अत्यंत दुख होत आहे कि, आपल्या देशातील, आपल्या परिसरातील, ठाणाळे बौद्ध लेणी येथे असलेल्या निर्वाण भूमी येथील स्तुपांवरती काही अविचारी समाजकंटकांनी नावे लिहून विद्रूप केले, संस्थेच्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्यात येत आहे. बंधुंनो, आपण जर आपल्या लेण्यांवर गेलो नाहीत तर अशा प्रसंगांना आपणच खऱ्या अर्थाने जबाबदार आहोत. तसेच आपण जर आपला गौरवशाली इतिहास जनमाणसांमध्ये पसरविला नाही तर आपल्या लेणीवरील धम्मबांधव, पर्यटक यांना तो कळणार नाही, व त्याचे महत्व नसमजले कारणाने लेणींवर अशा प्रकारे नावे लिहून लेण्या विद्रूप करणे, जाणूनबुजून लेण्यांवरती तोडफोड करणे असे कृत्य होतच राहणार, म्हणून बंधुंनो, आपल्याला आपला गौरवशाली इतिहास जपण्याकरता सतत लेण्यांवरती गेलच पाहिजे, तर बंधुंनो, नवव्या लेखाचा भाग क्रमश ठेवून त्याचा क्रमश भाग लेख दहावा लेणी संवर्धन समितीच्या वतीने प्रकशित करण्यात येत आहे. त्याचा तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करून संवर्धनाच्या कामाला हातभार ही विनंती.


**वि. वा. येलवे** 

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक,**

**दि ग्रेट अशोका आर्मी**


**लेख दहावा**


**लेणी संवर्धन का आणि कशासाठी?**


बंधुंनो, सर्व प्रथम ठाणाळे लेणी समाजकंटकांनी विद्रूप केली. बंधुंनो, अशा नीच अविचारी लोकांपासून आपला गौरवशाली लेण्यांना धोका आहे, म्हणून आपल्याला सतत जागृत राहिले पहिले, आणि लेण्यांवरती जाऊन लेण्यांवरती लक्ष ठेऊन लेण्यांचा अभ्यास करत राहिला पाहिजे.

बंधुंनो, प्राचीन भारतातील एक स्वतंत्र कलाविष्कार म्हणून लेणी स्थापत्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. भारतात एकूण १५४५ लेण्यांचा शोध लागला असून, तापैकी १,२०० लेण्यांची नोंद पुरातत्व विभागाकडे आहे. त्यापैकी ९०० बौद्ध लेण्या असून, या लेण्यांचे काम मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाने प्रथम सुरु केले. पुढे हे कार्य मौर्य सातवाहन वाकाटक, राष्ट्रकुट, गुप्तवंश, चालुक्य, यादव यांच्या काळात चालू राहिले. महाराष्ट्रात सातवाहन काळात नाशिक, जुन्नर पितळखोरे, कार्ले, भाजे, कोंढाणे, अजिंठा, कान्हेरी, महाड येथे लेण्या खोदल्या गेल्या. बंधुंनो, आजचा विषय सुरुकरण्यापुर्वी मी आपणास सांगू इच्छितो कि, आपण लेणीवरती गेल्यानंतर आपल्याला लेण्यांवरती पाण्याच्या टाक्या दिसतात, बंधुंनो, या टाक्यांचा समूह कधी ५ कधी ७ अशा स्वरुपात वरती खालती लेण्यांवरती कोरलेल्या दिसतात, आपण सदर पाण्याच्या टाक्यांचे व्यवस्थीत निरीक्षण केले असता आपल्याला पाण्याच्या टाक्यांच्या रचनेवरून सदर टाक्यांमध्ये असलेले जिवंत झरे (पाण्याचेश्रोत) आजही काहिक पाण्याच्या टाक्यांमध्ये चालू असल्याचे दिसते. प्रत्येक पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचलेला असल्या कारणाने बंद झालेले दिसतात. बंधुंनो, काहिक पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरण्याकरिता पायऱ्या खोदलेल्या दिसून येतात. आणि त्या पायऱ्यांनी आपल्याला पाण्याच्या टाक्यात उतरता येऊ शकेल अशी सोय केलेली असते.

बंधुंनो, लेण्यांमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात. मुख्यता करून न्हाणपोढी, पानपोढी असे त्यांचे वर्णन केले जाते. बंधुंनो, न्हाणपोढी म्हणजे लेण्यांवरती असलेले भिक्षु अंघोळीकरता, चीवर धुण्याकरिता या पोढीतील पाण्याचा उपयोग करत, म्हणून या पोढीला न्हाणपोढी असे म्हटले जाते. बंधुंनो, लेण्यांवरती भिक्षु पाणी पिण्याकरिता ज्या पोढीतील पाण्याचा वापर करत त्या पोढीला पाणपोढी असे म्हटले जाते. तसेच लेण्यांवरती आपण व्यवस्थीत निरीक्षण केले असता पाण्याचे सिंचन व्हावे याकरिता नैसर्गिक तसेच कृत्रिम तलाव खोदलेले असल्याचे दिसते. अजिंठा लेणीच्या लेणे क्र. १८ हे लेणे रिकामे असून त्यात पाण्याचे तळे आपल्याला दिसून येते. बौद्ध लेण्यांवरती पाण्याचे व्यवस्थापन हा एक मोठा अभ्यासाचा विषय असून लेण्यांच्या अभ्यासाकरता आपल्याला लेणीवरती असलेले जल व्यवस्थापन पाहता येईल. अजिंठा लेणीमध्ये लेणे क्र. २४ येथे जलदेवता ह्याचे शिल्प दिसून येते. बंधुंनो, अभ्यासाकरिता कान्हेरी लेणी घेतली असता कान्हेरी लेणीमध्ये बौद्ध भिक्षुंना राहण्याकरिता विहारे खोदले गेले असून एकूण १०९ गुंफा आहेत. या लेण्यांच्या वरील बाजूस पाण्याचा पाठ आणि हौद आहे. पुरातन काळात पावसाचे पाणी विशेष प्रकारे वळवून पाण्याच्या मोठ्या टाक्या त्याने भरल्या जात असे. कान्हेरी येथील चैत्यगृहाच्या पुढेच लेणी ५ च्या पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूला सातवाहनाच्या अतिशय महत्वाचा काहीसा खंडित शिलालेख प्राचीन धम्मलिपीत कोरलेले असून त्याचा लिपियंत “......वासिष्ठीपुत्रस्य श्रीसात[कर्णी]स्य देव्या: कार्दमक-राजवंशप्र[भ]वाया महाक्षत्र[प्र] रुद्र...पुत्र्या:...... ........[स्या]....[वि]श्र्वस्यस्य अमात्यस्य शतेरकस्य पानीयभोजनं देयधर्म्म:” याचा मराठी भाषेत अर्थ “......वासिष्ठीपुत्र श्रीसातकर्णीची राणी.... जी कार्दमक राजवंशात जन्मली आहे आणि महाक्षत्रप रुद्र [रुद्रदामन] याची कन्या आहे तिच्या शतेरक नामक विश्वासू अमात्याचा हे पाण्याने धर्मादाय आहे”. तसेच बंधुंनो, कान्हेरीमधील पाण्याची व्यवस्था वरती जगातील संशोधक येऊन त्याचा अभ्यास करत आहेत, पावसाळ्यामध्ये पावसाचे आणि कान्हेरी लेणी समोरील हौदामध्ये साठविण्यासाठी डोंगरामध्ये एक पाणी वाहण्यासाठी नळी खोदुन ती हौद पर्यंत आणलेली आपल्याला दिसते. तेथून जवळ जवळ प्रत्येक लेणीमध्ये पाणी पुरविण्याची व्यवस्था केलेली आहे. आज देखील आपण कान्हेरीमध्ये पाण्याची व्यवस्था पाहू शकतो. तसेच बंधुंनो, जुन्नर परिसरातील मानमोडी टेकडीवरील लेणी समुहात मानमोडी अंबा-अंबिका भूतलिंग लेण्या दिसून येतात. एकूण ६८ पूर्ण अपूर्ण लेण्या असून तेथे ३८ पाण्याच्या टाक्या, हौद (पोढी), मिळून आलेल्या आहेत. त्यातील एका पोढीला दान दिल्याचा लेख लेणे क्र. ५ मध्ये लिहिलेला आहे. तर बंधुंनो, शिवनेरी येथे असलेल्या लेणी समुहावर ६० पाण्याच्या टाक्या मिळून आल्या आहेत. त्यापैकी लेणे क्र. ४९ ते ५३ येथे पाण्याची दोन टाक्यांवरती शिलालेख असून त्या शिलालेखा प्रमाणे “गता” देशाचा यवन (ग्रीक) “इरिल” याने पाण्याच्या टाक्या दान दिल्याचा उल्लेख आहे. बंधुंनो, कुडा लेणीमधील प्रत्येक लेणीजवळ पाण्याचे कुंड कोरलेले दिसून येतात. बंधुंनो, आपण कोणत्याही लेण्यांवरती गेल्यावर तिथे आपल्याला जिवंत पाण्याचे श्रोत दिसून येतात. तसेच काहिक लेण्यांमध्ये पाणी भरलेले देखील दिसून येते. काहिक वेळेला पाण्याचे श्रोत वर्षांवर्षे वाहत असलेले मार्गामध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येते. अभ्यासांकी असे दिसून येते जुन्या काळामध्ये लेण्यांजवळ गडांना, किल्यांना कोट बांधले गेले, किल्यांवरती आक्रमणे झाली दारू-गोळे, तोफांचे गोळे, लागले गेले, त्यामुळे जवळपास असलेल्या लेणीतील पाण्याच्या श्रोतांवर परिणाम झाले. काळाच्या ओघाने कुंडामधून झिरपणारे पाणी उपयोगात न आणल्या कारणाने त्यामध्ये गाळ निर्माण होऊन तळाला बसला, व पाण्याचा श्रोत पूर्णपणे बंद झाला व त्यानंतर असे कुंडे मातीमध्ये बुझली गेली. बंधुंनो, अंबा-अंबिका लेणी येथे ३३ खोदकामे हे पाण्याच्या टाक्या प्रमाणे असल्याचे दिसते. आगाशीव लेणी (जखिणवाडी लेणी) येथे देखील पाण्याची कुंडे खोदलेले आहेत. वेरुळच्या लेणीत लेणे क्र. १८ येथे पाण्याचे तळे आणि लेणे क्र. २४ येथे जलदेवतेचे चित्र आढळून आले आहे. कांब्रे गावाजवळ असलेल्या लेणीत पाण्याची टाकी तसेच सारीपाठाचा खेळ कोरलेला आहे. जुन्नर मधील कपिचीत बुद्ध लेणी येथे पूर्व व पश्चिम भागी २८ लेण्या असून बौद्ध भिक्षुंसाठी पाण्याच्या ४ टाक्या खोदल्या असून त्यामध्ये वर्षभर पाणी असते. तसेच बेडसे लेणी सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात कोरली असून तेथे चैत्यगृह, विहार, कोरीव स्तूपांसह पाण्याचे कुंडे आहेत, इत्यादी सर्व लेण्यांवरती भिक्षूंची पाण्याची सोय करण्याकरिता पाण्याचे टाके, टाकी, कुंडे, तलावे तसेच कान्हेरी येथे एक लेणीच्या बाजूला विहीर खोदलेली दिसून येते. विहीर किती जुनी आहे या बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. लेणींच्या अभ्यासात लेणींमध्ये असलेल्या पाण्याच्या कुंडाचे दान दिल्याचे प्रामुख्याने दिसून येते, तरी सखोल असा लेणीवरील पाण्याच्या कुंडाचा, पोढींचा हवातेवढा अभ्यास झालेला नाही. तर बंधुंनो, आपल्याला लेण्यांवरती असलेल्या पाण्याचा शोध यावरती सखोल अभ्यास करायचा आहे. तसेच नेहमी प्रमाणे आपण संकल्प करूया आपल्या लेण्यांवरती कोणत्याही प्रकारचे विद्रुपीकरण कोणीही करणार नाही त्यासाठी आपण जागृत होऊया, तर बंधुंनो, तूर्तास हा लेख खूप मोठा होत असल्या कारणाने मी इथेच थांबून पुढील लेख लेण्यांमधील काळखंड, राजघराणे आणि त्यांचे लेणी निर्मितीला योगदान या विषयावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. एवढ सांगून हा लेख क्रमश चालू ठेवून मी इथेच थांबतो.


**क्रमश**


**वि. वा. येलवे**

**राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संघटक

**दि ग्रेट अशोका आर्मी**

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌹🌹🌹



Post a Comment

0 Comments