Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

रणजीत पाटील
(पुणे प्रतिनिधी)

   कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असून ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. मात्र, पुण्यात आज कोणतेच लसीकरण होणार नसल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ‘पुणे महापालिकेस लसींचा पुरवठा न झाल्याने सोमवार, दि. १७ मे, २०२१ रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत,’ असं मोहोळ म्हणाले आहेत.

                           [जाहिरात]
                             [जाहिरात]
 
कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे ?

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘देशासह विदेशातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाची लागण होऊन गेलेल्या नागरिकांमध्ये साधारणतः ६ महिने अँटीबॉडीज असतात. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांनी ६ महिन्यानंतर म्हणजेच कोरोनातून बरं झाल्यानंतरच्या ६ महिन्यांनी लस घ्यावी. ६ महिन्यापर्यंत अँटीबॉडीज कोरोनापासून रक्षण करतात, असं वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं आहे.’ असं डॉ. पॉल म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments